govinda reaction : बॉलीवूड स्टार गोविंदा नेहमीच चर्चेचा भाग राहिला आहे. त्यांची पत्नी सुनीता सतत अशी वक्तव्ये करत असते, ज्यानंतर ही जोडी चर्चेत आलेली पाहायला मिळाली आहे. गोविंदाबद्दल नेहमीच असे म्हटले जाते की, तो सेटवर उशिरा पोहोचायचा. आता त्यांनी या नकारात्मक प्रसिद्धीवर प्रतिक्रिया दिली आहे. तो अलीकडेच काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या शोमध्ये गेला होता. जिथे त्याने सांगितले की, जेव्हा इंडस्ट्रीतील लोक उशीरा येण्याबद्दल त्याची बदनामी करतात तेव्हा त्याला वाईट वाटते.
चित्रपटाच्या सेटवर उशिरा येण्याच्या त्याच्या सवयीबद्दल त्याने दीर्घकाळ चाललेल्या अफवांवर प्रतिक्रिया दिली. ज्याने काही व्यावसायिक संबंध बिघडवले होते. गोविंदाने स्पष्टीकरण देत ही अफवा पसरवणाऱ्यांना फटकारले. गोविंदा म्हणाला, “मी वेळेवर न आल्यामुळे माझी बदनामी झाली. मी म्हणालो कोणाच्या वडिलांमध्ये पाच शिफ्ट्स करुन वेळेवर येण्याची ताकद आहे. ते शक्य नाही, होऊ शकत नाही. माणूस एवढं शूटिंग कसं करेल? इथे फक्त एका चित्रपटात लोक थकतात”.
गोविंदाच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आपल्या कॉमिक टायमिंग आणि डान्स मूव्ह्सने सर्वांची मने जिंकली आहेत. ८०-९० च्या दशकात त्यांना खूप प्रेम मिळाले. ते अव्वल अभिनेत्यांपैकी एक होते. ‘इल्जाम’, ‘लव ८६’, ‘इश्क में जीना इश्क में मरना’ यांसारख्या चित्रपटात काम केले. त्यानंतर डेव्हिड धवनसह ‘कुली नंबर १’, ‘हीरो नंबर’, ‘राजा बाबू’ आणि ‘पार्टनर’ यांसारख्या कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांची चित्रपट कारकीर्द तीन दशकांची आहे.
२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगीला राजू’ या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. आता गोविंदा अनेकदा रिॲलिटी शोमध्ये पाहुणे म्हणून येतो. जिथे तो त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलतो.





