दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, गायक, परिक्षक आणि निर्माता अशा अनेक विविधांगी भूमिकांमध्ये दिसणारा हरहुन्नरी कलाकार म्हणजे अवधूत गुप्ते. आज यशाच्या शिखरावर असणारा अवधूत एकेकाळी संगीत विश्वात स्टगल करत होता. मराठी इंडस्ट्रीत ओळख कमावण्यापूर्वी त्याने एका हिंदी रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. ‘सा रे ग म प’, ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमांमध्ये अवधूतने परिक्षकाची भूमिका बजावली होती.
पण तुम्हाला माहीत आहे का ‘सारेगमप हिंदी’मध्ये अवधूत स्पर्धक म्हणूनही सहभागी झाला होता. १९९६ साली पार पडलेल्या या शोचा विजेताही अवधूत गुप्ते ठरला होता. त्यावेळी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्याकडे होती. तेव्हा ते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असूनही गायक अवधूत गुप्ते हे सोनू निगमच्या पाया पडायचे. स्वत: अवधूत यांनी याबद्दल खुलासा केला आहे.
नुकत्याच मिरची मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितले आहे. यावेळी अवधूत गुप्ते यांनी असं म्हटलं की, “सोनू निगम हे तेव्हा अँकर (सूत्रसंचालक) होते. तेव्हा मी त्यांना नमस्कार करायचो. तसं मी आजही त्यांच्या पायाला हात लावून त्यांना नमस्कार करतो. मला वयामधलं अंतर महत्त्वाचे वाटत नाही. हे तेव्हापासून निश्चित झालं आहे”.
यापुढे अवधूत यांनी गमंतीत असं म्हटलं की, “एकदा एखाद्याला बाप म्हटलं की बापचं म्हणावं लागतं. काही काळानंतर नाही आता मी तुझा बाप आहे असं नाही करता येत ना.” दरम्यान, अवधूत गुप्ते यांनी आजवर त्यांच्या अनेक गाण्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध तर केलंच आहे. पण त्यांनी त्यांच्या दिग्दर्शनाद्वारेदेखील प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
आणखी वाचा – ‘चला हवा येऊ द्या’चा शेवटचा भाग अन् मंचावर भावूक झाला कुशल बद्रिके, पोस्ट शेअर करत म्हणाला, “चूकभूल…”
दरम्यान, अवधूत यांनी ‘मोरया’, ‘झेंडा’, ‘एक तारा’ तसेच ‘कान्हा’सारख्या चित्रपटातून महाराष्ट्रातील सण-समारंभ व राजकारणावर भाष्य केले आहे. संगीतकार आणि गायक म्हणून त्याने मराठी संगीत विश्वाला एकापेक्षा एक सरस गाणी दिली. त्याच्या अनेक रॉकिंग अल्बमनी तरुणाईला अक्षरश: वेड लावले होते. शिवाय त्याने सिनेदिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही जबाबदारी निभावली.