‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत सध्या असं पाहायला मिळत आहे की, अमोल अप्पी व अर्जुन यांना एकत्र आणण्यासाठी खूप आटोक्याचे प्रयत्न करत असतो. वटपौर्णिमेची पूजा करताना जेव्हा आर्या व अप्पी समोरासमोर येतात तेव्हा त्यांच्यात वाद होतो. हा वाद पाहून अमोल अर्जुनला तिथे बोलावून घेतो. तर अमोलनेही वटपौर्णिमेचा उपवास ठेवलेला असतो जेणेकरुन त्याचे आई-बाबा एकत्र यावेत अशी त्याची इच्छा असते. आणि साता जन्मासाठी ते एकत्र राहावेत आणि त्याला तेच आई-बाबा भेटावेत या इच्छेखातर तो उपवास धरतो आणि वटपौर्णिमेची पूजाही करतो. त्यावेळी अचानक अमोलला चक्कर येते आणि तो खाली कोसळतो. (Appi Amchi Collector)
तातडीने अमोलला घेऊन अप्पी व अर्जुन घरी येतात आणि डॉक्टरांना बोलावून घेतात. तर उपवास धरल्याने त्याला चक्कर आल्याच त्यांच्यासमोर येतं. अर्जुन अमोलची तब्येत पाहून त्याच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतो आणि त्याला एकट्याला कसं टाकून जाणार बरं नसताना असं म्हणून तिथेच थांबतो. तर अमोलही अर्जुनने त्याच्या बरोबरच राहावे असा हट्ट धरतो. तर इकडे आर्यानेही अर्जुनसाठी निर्जळ उपवास केलेला असतो. हा निर्जळी उपवास सोडण्यासाठी आर्या अर्जुनची वाट बघत असते आणि ती कदमांच्या घरी जाऊन मोठमोठ्याने त्रागाही करते. तेव्हा अर्जुनचे बाबा सांगतात की, तू एकदा त्याला फोन करुन स्पष्टपणे बोलून घे.
यावर आर्या अर्जुनला फोन लावते आणि सांगते की, तू आत्ताच्या आता इथे निघून ये. मी निर्जळी उपवास केला आहे. तू इथे आल्याशिवाय मी काही उपवास सोडत नसते. यावर अर्जुन सांगतो की, मला आता इथून निघता येणार नाही कारण अमोलची तब्येत खराब आहे आणि मी त्याला एकट्याला सोडून येऊ शकत नाही.तुला मी तुला सॉरी म्हणतोय तू मला जरा समजून घे. यावर आर्या काहीच ऐकून घेत नाही. आर्या सांगते की, एक तर एका वेळेला तू एकच काहीतरी निवडशील आणि तुझं काय ठरणार आहे हे तू जोपर्यंत फिक्स करत नाहीस तोपर्यंत मी काही पुन्हा या घरात येत नसते, असं म्हणून ती फोन ठेवते आणि निघून जाते.
तर इकडे अमोलची काळजी घेण्यात अर्जुन व अप्पी व्यस्त असतात आणि त्याला गोष्ट सांगत असतात. आणि गोष्ट सांगता सांगताच त्यांना झोप लागते आणि ते एकत्रच एकमेकांच्या हातात हात घेत झोपून जातात. आता अमोल अर्जुन व अप्पीला एकत्र कसं आणणार?, आर्या अर्जुनबरोबरचा साखरपुडा मोडणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.