Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉसच्या घरात सध्या अनेक सदस्यांमध्ये चांगलेच वाद निर्माण झालेले पाहायला मिळत आहेत. तर नुकतीच सागर आणि तन्वीमध्ये भांडणं झालेली पाहायला मिळाली. रुचिता विनाकारण ओरडत असल्यामुळे तन्वी तिला सुनावते. यानंतर रुचितावरून सागर तन्वीशी भांडतो. यादरम्यान आता टोळीमधील सदस्यांमध्ये फूट पडल्याचं दिसून येत आहे. ‘बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमध्ये विशालची टोळी ही खूपच चर्चेत असलेली पाहायला मिळते. आता या टोळीमध्येच फूट पडली आहे.
नुकताच ‘बिग बॉस’चा प्रेम समोर आला. ज्यामध्ये अनुश्री आणि रुचिता यांच्यात जोरदार वाद झाल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळतं. प्रोमोमध्ये रुचिता अनुश्रीवर ओरडत म्हणते, “मला जेव्हा जे बोलायचं तेव्हा मी बोलणार” यावर प्रत्युत्तर करत अनुश्री म्हणते, “प्रत्येक वेळी तलवार काढून खेळायची गरज नसते. पुढे प्रोमोमध्ये त्यांच्या वादादरम्यान दोघीही एकमेकींना डिवचतात. “तू तुझी काशी कर” या शब्दात अनुश्री रुचिताला सुनावते. तर रुचिता सुद्धा तिला तिच्याच भाषेत उत्तर देताना दिसते. टोळीमधीलच सदस्यांमध्ये जबरदस्त वाद झाले आहेत. आता अनुश्री आणि रुचिता यांच्या वादामुळे ही टोळी फुटणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे. (Bigg Boss Marathi 6)




