अभिनेता रणदीप हुड्डा हा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’मुळे अधिक चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये तो मुख्य भूमिकेत दिसणार असून चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुराही तो सांभाळत आहे. त्याने नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोमध्ये त्याने त्याचे वजन खूप कमी केल्याचे दिसत आहे. त्याने वजन सावरकरांच्या भूमिकेसाठी कमी केल्याने अनेकांनी त्याचे खूप कौतुक केले आहे. पण सध्या तो चित्रपटामुळे नाही तर विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चनवर केलेल्या विधानामुळे चर्चेत आला आहे. (Randeep hudda on aishwarya rai bachchan)
२०१६ साली तो ऐश्वर्याबरोबर ‘सरबजीत’ या चित्रपटामध्ये दिसला होता. त्यावेळी त्याने ऐश्वर्याबरोबर आलेला अनुभाव त्याने सांगितला आहे. त्याने सांगितले की चित्रपट निर्मात्यांनी तिला खरे दाखवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. पण ती खरी वाटली नाही. या चित्रपटामध्ये सरबजीत सिंह यांचे आयुष्य दाखवण्यात आले होते. सरबजीत यांना पाकिस्तानात दहशतवादी म्हणून पकडण्यात आले आणि तिथे त्यानं खूप त्रास देण्यात आला होता. त्यामुळे दलबीर कौर या सरबजीतसाठी न्यायालयात लढल्या होत्या. यामध्ये सरबजीतची भूमिका रणदीपने साकारली होती.
रणदीपने ऐश्वर्याबद्दल बोलताना म्हणाला की, “ती खूप चांगली आहे. खूप विनम्र आहे. ती तिचे कामही खूप योग्यरित्या करते. पण सेटवर आम्ही एकमेकांशी जास्त बोललो नाही. आमचे खूप कमी सीन एकत्र होते. पण जेव्हा आम्ही सीन चित्रित करायचो तेव्हा मात्र ती खूप छान काम करत असे”. पुढे तो म्हणाला की, “निर्मात्यांनी ऐश्वर्याला जशी आहे तशी दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र निर्मात्यांना ते जमले नाही”.
रणदीप हुड्डा पुढे म्हणाला की, “हा चित्रपट करताना मी ऐश्वर्यापेक्षा दलबीर कौर यांच्याबरोबर अधिक जोडला गेलो. दलबीर कौर यांनीही मला भाऊ मानले होते. त्या मला राखी बांधायच्या. त्यांच्या मृत्यूनंतर मी त्यांच्या चितेला अग्नी द्यावा ही त्यांची शेवटची इच्छा होती आणि त्यांची इच्छा मी पूर्ण केली. त्यानंतर त्यांच्यासाठी शोक सभाही आयोजित केली होती. त्या माझ्या एकदम जवळच्या व्यक्ती होत्या”.
‘सरबजीत’नंतर आताही रणदीप ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ यांचा बायोपिक करताना दिसणार आहे. सावरकर एक स्वातंत्र्य सेनानी, समाजसुधारक व इतिहासकार होते. ही भूमिका करण्यासाठी रणदीपने २६ किलो वजन कमी केले आहे.