‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या कालच्या भागात विरोचकाने तयार केलेलं प्रतिबिंब फाल्गुनी यांच्या खोलीत गेले होते. त्यानंतर तन्मयने हळूच अद्वैतला मॅसेज करत नेत्रा व इंद्राणी व शेखर यांना त्यांच्या खोलीत बोलावले. त्यानंतर शेखरचे प्रतिबिंब बघून सर्वांनाच धक्का बसला. शेखरनादेखील त्यांचेच प्रतिबिंब बघून धक्का बसला. त्यानंतर काही वेळात तिथे रुपाली आली आणि त्यानंतर सर्वांच्या समोरच ते प्रतिबिंब नष्ट झाले.
प्रतिबिंब नष्ट होतात नेत्रा व इंद्राणी यांनी रुपालीला तू काहीही केलंस तरी तुझी कोणतीच शक्ती कामी येणार नाही असं म्हटलं. त्यानंतर रुपाली तिच्या खोलीत जाऊन तिने मूर्खपणा केल्याचे स्वतःलाच म्हणत राहिली. इकडे रुपाली तिच्या शक्तीबद्दल विचार करत होती तर दुसरीकडे राजाध्यक्ष कुटुंबीयही त्या प्रतिबिंब शक्तीबद्दल विचार करत आहेत. ते प्रतिबिंब नक्की किती वेळ राहते. याचा ते विचार करत असतात. यावरुन त्यांना कळते की, विरोचक हा फक्त सूर्यास्तानंतरच ते प्रतिबिंब तयार करतो.
त्यानंतर नेत्रा ओटीत मिळालेल्या वस्त्रात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करते. मात्र तिला त्यात काहीही मिळत नाही. त्यानंतर इंद्राणीही तिथे येते. त्या दोघी मिळून त्या वस्त्रात काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांच्या हाती काहीही लागत नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नेत्रा व अद्वैत सकाळी एकमेकांशी बोलत असताना त्यांच्या खोलीबाहेर दाराची बेल वाजते. अद्वैत दरवाजा उघडून बघायला जातो तेव्हा तेजस हा खूप दिवसांनी घरी आलेला असतो.
आणखी वाचा – शिवाच्या वागण्याचा आशूला त्रास, हात उचलताच रामभाऊंनी रोखलं अन्…; नात्याला वेगळंच वळण
त्यामुळे आता हा तेजस अचानक कसा काय आला? यायच्या आधी त्याने कुणाला काही सांगितलं होतं का? की त्याला आणण्यामागे विरोचकाचाच काही डाव आहे? हे आता पुढील भागात पाहायला मिळणार आहे. तसेच विरोचकाला राजध्यक्षांच्या ‘मी काय म्हणते आणि मी काय म्हणतो’ या सांकेतिक वाक्याबद्दल कळणार आहे.