‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, अर्जुन गुरुजींना सायलीबरोबर पूजा करायची आहे पण सगळ्यांसमोर तुम्ही मला आग्रह करा अस सांगतात. आणि ठरल्याप्रमाणे सायली पूजा करत असताना गुरुजी सगळ्यांसमोर अर्जुनलाही आग्रह करतात. अर्जुन तुम्ही आग्रह करताय म्हणून मी पूजा करतो असं म्हणत पूजा करतो.आणि सायलीच्या बाजूला येऊन बसतो. सायली म्हणते सगळेजण हसत आहेत. यावर अर्जुन म्हणतो, हसू दे. आपण पूजा करुयात”. त्यांनतर दोघेही जोडीने पूजा करु लागतात. सायली नमस्कार करताना मनात म्हणते, “देवी सावित्री माझं सौभाग्य तुझ्या इतकं ताकदवान ठरु दे. या नात्याचं पुढे काय होईल मला माहित नाही पण माझ्या मनातलं यांच्या बद्दलच प्रेम कधीच जाणार नाही एवढं नक्की”, असं म्हणत सायली वडाच्या झाडाला धागा बांधते व फेऱ्या मारायला सुरु करते. (Tharal Tar Mag Serial Update)
तितक्यातच जोरात पाऊस पडतो. सगळ्या बायका बाजूला जाऊन उभ्या राहतात. अर्जुन तिथेच उभा राहतो. “मिसेस सायली पाऊस पडत असताना ही प्रदक्षिणा घालत आहेत आता मी काय करु”, असं तो मनातल्या मनात म्हणतो. लगेचच अर्जुन केळीचं पान घेऊन येतो आणि सायलीच्या डोक्यावर धरतो. त्यानंतर ते एकत्र वडाला फेऱ्या मारु लागतात हे पाहून सगळे खुश होतात. सायलीलाही हे पाहून छान वाटतं. हे सगळं पाहून मात्र अस्मिताची चिडचिड होते. सगळेचजण अर्जुनचं कौतुक करतात. वडाची पूजा केल्यानंतर सगळे घरी येतात. कल्पना विमलला सायली बरोबर अर्जुननेही पूजा केल्याचं सांगते. तेवढ्यातच प्रताप, अश्विन, चैतन्य तिथे येतात आणि सगळे अर्जुनची खिल्ली उडवतात.
प्रताप अर्जुनला विचारतो तू कशी काय पूजा केलीस? तुला हे सुचलं कसं?, यावर अर्जुन म्हणतो, “गुरुजींमुळे मी पूजा केली त्यांनी मला आग्रह केला”. कल्पना म्हणते, “नाही नाही अर्जुन. तुझं आधीच ठरलं होतं”. अश्विन म्हणतो, “तू आता नाटक करु नकोस. आम्हाला सगळं माहित आहे”. अर्जुन चैतन्यला म्हणतो. “चल आपण ऑफिसला जाऊयात”. तेव्हढ्यात सायली त्यांना आडवते व बोलते, “थांबा मी तुम्हाला नाश्ता आणते”. यावर अर्जुन नकार देतो ,अर्जुन डब्बा घेऊन जायलाही नकार देतो व गडबडीत निघून जातो. इकडे प्रियाला अर्जुनच्या ऑफिसमधून गोरे बाईंचा फोन येतो. प्रिया तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईलबद्दल विचारते. यावर गोरे बाई पैसे मागते. प्रिया म्हणते, “आधी फाईल मग पैसे”. दुसरीकडे सायली प्रचंड खुश असते. वटपौर्णिमेच्या पूजेच्या वेळी काय काय घडलं हे सगळं तिला आठवत असतं. इकडे ऑफिसमध्ये अर्जुन एकीकडे बघत विचार करत बसतो तर चैतन्य त्याला काम बाजूला ठेवून आपण जेवून घेऊ, असं म्हणतो.
तर इकडे सायली तिच्या डायरीमध्ये, गेल्यावर्षीच्या आणि या वर्षीच्या वटपौर्णिमेमध्ये फरक आहे असं लिहिते. तर ऑफिसमध्ये चैतन्य अर्जुनसाठी जेवणाचं ताट वाढतो यावर अर्जुन मला जेवायचं नाही असं म्हणतो. चैतन्य त्याच्या तब्येतीबद्दल विचारणा करतो. मालिकेच्या पुढील भागात पाहणार आहोत की, अर्जुन घरी येताच त्याला चक्कर येते व तो पडतो. सगळे गडबडतात. सायली चैतन्यला जेवायला थांबण्याची विनंती करते. चैतन्य म्हणतो, “मी नाही जेऊ शकत मी दुपारी अर्जुनाचाही डब्बा संपवला आहे. कारण अर्जुनने सायलीला निर्जळी उपवास धरला आहे”.