‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, दिशा पारूने लावलेलं रोपटं काढून फेकून देते. तर इकडे दिशावर पारूने लावलेलं रोपटं काढलं म्हणून गनी दिशाला जाब विचारत असतो. त्यावेळेला दिशा रागाच्या भरात गनीच्या कानाखाली मारते, यावर पारूचाही संताप होतो. तुम्ही मालक आहात मग आमच्या नोकर माणसांमध्ये का लक्ष घालताय, केव्हापासून बघते तुम्ही माझ्या हात धुवून पाठीशी लागल्या आहेत, असं असेल तर आम्हालाही तुमच्या भाषेत उत्तर देता येतं असं पारू दिशाला बोलते. हे बोलताना अहिल्यादेवी तिथे येतात आणि अहिल्यादेवी फक्त पारूचं बोलणं ऐकतात तेव्हा त्या पारूला विचारतात की, तू तिला जाब विचारणारी आहेस कोण?, ती या घरची सून आहे. कुठे काय बोलावं याचं भान असू दे पारू, असं म्हणत पारूला ऐकवतात. (Paaru Serial Update)
तर दिशा उगीच सगळं क्रेडिट घेत अहिल्यादेवी समोर चांगली मुलगी बणण्याचा प्रयत्न करते आणि अहिल्या देवींना आत घेऊन जाते. त्यानंतर पारू ते रोपटे घेऊन घरी येते, त्यावेळेला मारुतीला कळतं की, पारू ने जाऊन दिशाला सुनावलं आहे. त्यावर मारुतीही भडकलेला असतो. मारुती म्हणतो की, आपण नोकर आहोत आणि ते मालक आहेत. आपण आपली जागा ओळखून राहायला हवं. त्यांच्यात आणि आपल्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यांच्यात आणि आपल्यात खूप अंतर आहे, त्यामुळे आपण कुठे, काय, कसं बोलावं याचं थोडं तरी भान असू द्या, असं म्हणून तो पारूला ओरडत असतो तितक्यात प्रीतम तिथे येतो. प्रीतम म्हणतो की, यात पारूची नक्कीच काही चूक नसेल, तुम्ही तिला बोलू नका, यावर पारू प्रीतमवरच चिडते आणि म्हणते की, तुम्ही इथे का आला आहात तुम्ही नोकर माणसांच्या उंबरठ्यापाशी कशाला आला आहात?, तुम्ही मालक आहात तर तुम्ही मालकांसारखेच राहा, हे ऐकून मारुती अजूनच रागावतो आणि प्रीतमला रिक्वेस्ट करतो की, तुम्ही आता इथून जा पारूचं डोकं ठिकाणावर नाही आहे.
मी तिला समजावतो. यानंतर मारुती पारुला म्हणतो तुझं खूपच तोंड चालायला लागलं आहे. तर इकडे अहिल्यादेवीना कॉफी हवी असते तेव्हा सावित्री कॉफी घेऊन येते मात्र रोजसारखी कॉफी नसल्याने त्या भडकतात. रोज तुमची कॉफी पारू बनवते त्यामुळे असेल असं सावित्री म्हणते. त्यावर अहिल्यादेवी चिडतात आणि म्हणतात की, किर्लोस्कर घर एका माणसावर अवलंबून नाही आहे. याआधी पारू नव्हती तेव्हा तू सगळं काही करत होती त्यामुळे आताही तू करावं. तर इकडे आदित्य ही सकाळी उठतो आणि म्हणतो की, कधीच पारुची कॉफीची वेळ चुकत नाही. आज असं काय झाले आणि त्यानंतर तो गॅलरीत येतो तर त्याला जास्वंदीचे रोपटे दिसत नाही. त्यानंतर पारू जास्वंदीचे रोपटं तिच्याच घराबाहेर लावत असते. तितक्यात सावित्री बरोबर सगळी कामावरची माणसे येतात आणि पारूला विनवणी करतात की, तू पुन्हा कामावर यायला हवं.
देवीआई ओरडल्या असतील तरी त्यांचा राग मानून घेऊ नकोस मात्र पारू काहीच ऐकत नाही आणि लग्नाचं कारण देत कामावर न येणार असल्याचे सांगते. तर इकडे दामिनी व दिशा पारुला घराबाहेर काढलं म्हणून खूप खुश असतात. त्यानंतर पारू मारुती व गणीसाठी पिठलं भाकरी करते आणि गनी व मारुती ते पिठलं भाकरी खात खूप आनंदी असलेले पाहायला मिळतात. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात पारू पुन्हा कामावर परतणार का?, हे पाहणं रंजक ठरणार आहे.