‘पारू’ या मालिकेत सध्या आदित्य व पारू यांच्या लग्नाचं सत्य लपवण्यासाठी खटाटोप सुरु असलेला पाहायला मिळत आहे. एकीकडे आदित्य हे सत्य लपवल्यामुळे दडपणाखाली आहे. तर दुसरीकडे कडे दिशा व दामिनी हे सत्य अहिल्यादेवींसमोर कसं येईल याची वाट पाहत आहेत. अशातच मालिकेच्या कालच्या भागात दिशा पारुला ऐकवते की, “आता तू दिवस मोजायला सुरुवात कर. लवकरच तू या किर्लोस्कर बंगल्यातून बाहेर पडणार आहेस. तू माझ्याशी सुरुवातीला काय वागली आहेस हे मला चांगलंच लक्षात आहे आणि त्याचा मी बदला घेऊनच राहणार असं म्हणते.
अशातच आजच्या भागात दिशा पारूला तिच्या रुममधून जायला सांगते. यानंतर पारु बाहेर जात असताना तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खाली पडते. तेव्हा ते मंगळसूत्र लपवण्याचा पारू प्रयत्न करते आणि हीच गोष्ट दिशाच्या लक्षात येते. तेव्हा पारू पळत जाते आणि तिच्या मागोमाग दिशाही पळत जाते. पारू पळत पळत स्वयंपाक घरात जाते तितक्यात तिच्यामागे दिशाही येते अनाई ती पारूला तू काहीतरी चोरी केली आहेस म्हणून अशी पळत आहेस असं म्हणते. इतक्यात तिथे दामिनी येते आणि तीदेखील पारूवर चोरीचा आल घेते. तसेच तिची चौकशीही करते. मात्र तिच्याकडे काहीच मिळत नाही.
आणखी वाचा – Video : कंगना रणौतला बिनधास्त कानाखाली मारल्यानंतर CISF महिलेने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझी आई जेव्हा…”
यादरम्यान दिशापासून गळ्यातील मंगळसूत्र वाचवण्यासाठी पारू ते तोंडात लपवते. यानंतर एकीकडे पारू तिच्या दोंदात लपवलेले मंगळसूत्र काढते, तेवढ्यात तिकडे जिन्यांवरुन उतरताना आदित्यचा तोल जातो आणि तो खाली पडतो. यानंतर त्याच्या पायाला गंभीर दुखापत होते. आदित्य पडल्याचे कळताच सगळे धावत येतात. त्यानंतर तिथे पारू येते व ती त्याला उचळण्यासाठी अहिल्यादेवींची मदत करते. नंतर पारू आयुर्वेदिक लेप लावल्यामुळे त्यांना बरं वाटेल असं म्हणते. त्यावर दिशा लेपपेक्षा डॉक्टरांना बोलावले पाहिजे असं म्हणते. यावर अहिल्यादेवी पारुला डॉक्टर येईपर्यंत लेप लावण्याचा सल्ला देतात.
यानंतर पारू मी गळ्यातलं मंगळसूत्र काढल्यामुळे आदित्य पडल्याचे स्वत:शीच म्हणते. तसेच याबद्दल ती आईच्या फोटोकडे बघून आदित्यच्या संरक्षणासाठी लोकांपासून वाचवून हे मंगळसूत्र मला गळ्यात घातले पाहिजे असं म्हणते. यानंतर पारू तिने बनवलेला लेप आदित्यच्या पायाला लावते. पुढे दामिनी पारू आदित्यच्या पायाला लेप लावत डोळ्यातून अश्रु गाळत असल्याचे अहिल्यादेवींना सांगते. तसेच ती पारूबद्दल कानही भरते. मात्र अहिल्यादेवी दामिनीचे काहीही ऐकून न घेता तिलाच दम देतात नि तिथून जायला सांगतात.