‘..म्हणून शाहरुखने ऐश्वर्याला चित्रपटातून काढून टाकलं’

shahrukh khan aishwarya rai
shahrukh khan aishwarya rai

बॉलिवूडमधील किंग खान, बादशाह म्हणजेच अभिनेता शाहरुख खान. जगभरात शाहरुख खानचे अनेक चाहते आहेत. शाहरुख खानने आजवर आपल्या अभिनयानं रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्याचा फॅन फॉलोविंगही खूप मोठा आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःच्या हिमतीवर शाहरुखने आपले नाव कमावले आहे. शाहरुख आणि ऐश्वर्या रायने एक काळ चांगलाच गाजवला. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं. मिस वर्ल्ड झाल्यामुळे चित्रपटसृष्टीने ऐश्वर्याला सुरुवातीला रेड कार्पेट ट्रीटमेंट दिली असली तरी यांत तिच्या मेहनतीचा अमूल्य वाटा आहे. (Shahrukh Khan Aishwarya Rai)

photo credit : google

 मन्सूर खानच्या ‘जोश’ मध्ये ऐश्वर्याने शाहरूख खानच्या जुळ्या बहिणीची भूमिका केली होती. त्या चित्रपटातील त्या दोघांची जोडी लक्षणीय होती. ‘जोश’मध्ये बहीण-भावाची भूमिका करणाऱ्या याच ऐश्वर्या-शाहरूखने नंतर ‘शक्ती’ मधला ‘आयटेम डान्स’, ‘मोहोब्बतें’, ‘देवदास’, ‘ऐ दिल हैं मुश्किल’सारख्या चित्रपटांत नायक-नायिकेच्या भूमिका रंगवल्या होत्या.

पहा काय घडलं होत ऐश्वर्या सोबत (Shahrukh Khan Aishwarya Rai)

आणखी एक ऐश्वर्या आणि शाहरुख खानच्या चित्रपटाबाबतचा एक किस्सा समोर आला आहे, ‘चंदेरी सोनेरी’ या पुस्तकात लेखिका ललिता ताम्हणे यांनी हा किस्सा सांगितला आहे. खरं तर, आणखी एका चित्रपटात ऐश्वर्या शाहरूखची नायिका म्हणून काम करत होती. तो चित्रपट होता- ‘चलते चलते’. ‘चलते चलते’च्या पहिल्या शेड्यूलसाठी एक सेट उभारण्यात आला होता. शूटिंगला सुरुवातही झाली होती. आणि अचानक, एका संध्याकाळी सलमान खान त्या सेटवर येऊन पोहोचला होता.

photo credit : google

काही कारणांमुळे त्याच्या आणि ऐश्वर्याच्या मैत्रीत दुरावा आल्यामुळे तो संतापलेला होता. त्याने रागाच्या भरात ‘चलते ‘चलते’च्या सेटवर म्हणे बराच गोंधळ घातला होता. इतकंच नव्हे, तर त्याने सेटचंही खूप नुकसान केलं होतं. त्यामुळे वैतागलेल्या शाहरूखने पुन्हा असा प्रकार होऊन नुकसान सोसायला लागू नये, म्हणून ऐश्वर्यालाच त्या चित्रपटातून काढून टाकलं होतं. ऐश्वर्याची स्वतःची काहीही चूक नसताना तिला ‘चलते चलते’ हा चित्रपट गमवावा लागला होता.(Shahrukh Khan Aishwarya Rai)

हे देखील वाचा – विक्षिप्त स्वभाव आणि खोटी साक्ष दिल्यामुळे जेल

शाहरूखने नंतर काजोलला विचारलं. पण अशा प्रकारे ऐश्वर्याला काढून टाकणं न पटल्यामुळे काजोलने नकार दिला. मग शाहरूखने राणी मुखर्जीला विचारलं. राणी तेव्हा चित्रपटसृष्टीत तशी नवीनच होती. शाहरूखला नकार देणं तिला शक्यच नव्हतं. मुख्य म्हणजे तिला तेव्हा चांगल्या चित्रपटाची गरजही होती. तिने चटकन होकार दिला आणि ‘चलते चलते’ चित्रपटात पुन्हा एकदा शाहरूख- राणीची जोडी यशस्वी ठरली. पण ऐश्वर्याचा मोठेपणा म्हणजे, तिने कधीही या खऱ्या गोष्टीची जाहीर वाच्यता केली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Fitness Freak Celebrities
Read More

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय योगा फ्रिक अभिनेत्री

योग ही एक जीवनशैली आहे. योगामुळे श्वासावरचं नियंत्रण, मानसिक शांतता या गोष्टींमध्ये खूप फरक पडतो. सर्वसामान्यांसपासून कलाकार मंडळींपर्यंत…
Queen of 80s faced worst things
Read More

शूटिंगदरम्यान जबरदस्ती केल्याने ‘या’ अभिनेत्रीने ठोकला सिनेविश्वाला रामराम

या घटनेनंतर अचानक अर्चना रुपेरी पडद्यावरून गायब झाली. करियरच्या टर्निंग पॉइंटवर असतानाच अर्चनाने लग्नाचा निर्णय घेतला आणि ती थेट अमेरिकेत स्थायिक झाली.
Mahesh Kothare Nilima Kothare
Read More

“खबरदार पुन्हा असं काही बोलशील तर!” महेश कोठारेंना दिली पत्नीने धमकी

पहिली माझी आई जेनमा आणि दुसरी माझी पत्नी नीलिमा! नीलिमा यांनी पत्नी म्हणून महेश यांची प्रत्येक काळात साथ दिली.
Dattu More Wedding News
Read More

‘म्हणून दत्तूने खाल्ला समीरचा ओरडा’ पाहा दत्तू ने लग्नाची बातमी सांगितल्यावर काय होत्या हास्य जत्रेतील मित्रांच्या रिअक्शन

अनेक कलाकार नेहमी चर्चेत असतात त्यांच्या आयुष्यातील कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे. सध्या असाच एक चर्चेचा विषय आहे तो…
Ashok saraf Sulochana Latkar
Read More

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी केले सुलोचना लाटकर कुटुंबियांचे सांत्वन

सुलोचना लाटकर यांच्या अंत्यदर्शनाला अभिनेते सचिन पिळगांकर, अशोक सराफ, निवेदिता सराफ तसेच राजकीय क्षेत्रातून मनसे अध्यक्ष