Monika Dabade Lovestory : ‘ठरलं तर मग’ या मालिकेने रसिकांच्या मनात घर केलं. ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकारांनी ही मालिका अव्वल स्थानावर आणली आहे. या मालिकेतील एक पात्र जे नेहमीच चर्चेत राहिलं आहे ते म्हणजे अस्मिता म्हणजेच मोनिका दाबाडे. मोनिकाला ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मोनिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत राहिली आहे. चार महिन्यांपूर्वीच मोनिका आई झाली. लग्नाच्या दहा वर्षांनी मोनिका व चिन्मय यांनी चिमुकलीचे स्वागत केले. पण तुम्हाला मोनिका आणि चिन्मय यांची लव्हस्टोरी माहित आहे का?.
फ्रेंडशिप डेचे औचित्य साधत मोनिका व चिन्मय यांनी ‘इट्स मज्जा मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी बोलताना मोनिकाच्या नवरा चिन्मय म्हणाला, “पुण्यातील दिवाळीच्या एका इव्हेंटच्या सूत्रसंचालनासाठी मला आणि मोनिकाला विचारण्यात आलं. त्यावेळी मी आणि मोनिका पहिल्यांदा भेटलो. आणि आमची ओळख झाली. त्यानंतर आम्ही बोलू लागलो, एकमेकांना ज्ञान देऊ लागलो, जो ज्या गोष्टीत तरबेज आहे ती गोष्ट आम्ही एकमेकांशी शेअर करु लागलो. आणि बोलता बोलता आमच्यातील मैत्री वाढत गेली”.
आणखी वाचा – “आठवणींनी झोळी भरली पण…”, ‘शिवा’ला निरोप देताना पूर्वा कौशिकच्या डोळ्यांत पाणी, म्हणाली, “माझ्या मर्यादा…”
पुढे चिन्मय म्हणाला, “एकमेकांबद्दलच आकर्षण वाढलं. आणि मग या मैत्रीण एक पाऊल पुढे टाकावं अशा गोष्टी सुरु झाल्या. आणि यासाठी वेळ एकत्र घालवणं अधिक महत्त्वाचं असल्याने मी एकत्र एक नाटक करण्याचा घाट घातला. यावर मोनिका म्हणाली, “आजही सगळे चिन्मयला चिडवतात की मोनिकाला पटवण्यासाठी हे नाटक त्याने केलं आहे”. पुढे चिन्मय म्हणाला, “ते नाटक आम्ही केलं, आणि इकडे आमच्या आयुष्याचं नाटकही झालं”.
आणखी वाचा – सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या वडिलांचे निधन, ८८ व्या वर्षी कर्करोगाशी लढाई अपयशी, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
यावर मोनिकाने तिचं मत मांडत म्हटलं, “मी पहिल्यांदा जेव्हा चिन्मयला भेटले तेव्हा मला असं झालं हा कोण आहे मुलगा?, आणि मुलं आपल्याला भाव देतात या हेतूनं तेव्हा मी थोडी माजातच होते. कालांतराने मला असं कळलं की, याच दुसरीकडे जुळलं आहे म्हणून मी मग विषयच सोडला. पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं आणि आम्ही नाट्यदरम्यान एकत्र भेटलो. आमच्यातील संवाद वाढला तेव्हा याचा स्वभाव लक्षात आला. एक चांगला, समजूतदार स्वभाव असल्याचं जाणवलं आणि मग आपण पुढे जायला हरकत नाही याची खात्री झाली”.





