सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जाईल ते म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या अभिनयाने आजवर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. याशिवाय त्यांच्या सौंदर्याचेही लाखो दिवाने चाहते आहेत. वयाची पन्नाशी जवळ आली असली तरी ऐश्वर्या यांचं सौंदर्य हे तरुणाईला लाजवेल असं आहे. अभिनय, सौंदर्य याशिवाय त्या सोशल मीडियावरील वावरामुळे नेहमीच चर्चेत असतात. (Aishwarya Narkar)
ही अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असण्याबरोबरच अनेकदा परखड मत मांडताना दिसते. अनेकदा ट्रेंडिंग रील व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अनेकदा अभिनेत्री ट्रेंडिंग रीलमुळे चर्चेत असली तरी तिला ट्रोलिंगचा शिकारही व्हावं लागलं आहे. ऐश्वर्या नारकर यांचे अविनाश नारकरांबरोबरचे अनेक रील व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. तर काहीजण या व्हिडीओवर ट्रोलही करतात. मात्र ऐश्वर्या या नेहमीच ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देताना दिसतात.
अशातच ऐश्वर्या यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक चारोळी जोडवी घातलेल्या सुंदर पायांसह शेअर केली आहे. या पोस्टवर “माझ्या प्रत्येक क्षणात, तुझा वाटा अर्धा आहे. भूतकाळ आठवयचाच तर, तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे”, असं म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. ही चंद्रशेखर गोखले यांची चारोळी ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केली असून ‘दिस नकळत जाई’ हे गाणं या व्हिडीओला दिलं आहे.
हा व्हिडीओ शेअर करत ऐश्वर्या नारकरांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “चारोळ्या…..तुम्हाला काही आठवतायत का?”. अभिनेत्रीच्या या पोस्टवर एका चाहत्याने केलेल्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. “मॅम तुमचा ब्रेकअप झाला होता का कधी? असं मला वाटतंय. सहज विचार आला म्हणून विचारलं”, अशी कमेंट त्याने केली आहे. या चाहत्याच्या कमेंटवर उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी, “नाही नाही”, असं म्हटलं आहे.