‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या कालच्या भागात तेजस आला असल्याचे पाहायला मिळाले. मात्र तो नक्की तेजसच आहे की त्याचे प्रतिबिंब आहे हे नेत्रा अद्वैतला कळत नव्हते. त्यामुळे अद्वैतएन साईटवरील काही लोकांना फोन करत घरी आलेला नक्की तेजसच आहे की नाही याची खात्री केली. त्यानंतर तिथे फाल्गुनी आली तेव्हा त्याने मी काय म्हणतो असं म्हटलं तेव्हा सर्वांना खात्री पटली की घरी आलेला हा नक्की तेजसच आहे. त्याचे प्रतिबिंब नाही.
त्यानंतर विरोचक फाल्गुनी हाताला नेलपेंट लावत असताना विरोचक तिच्या खोलीत जाऊन तिला शेखरचे प्रतिबिंब कसं ओळखलं असं विचारतो. पण तेव्हा फाल्गुनी विरोचकाला राक्षसऐवजी जोकर म्हणतो. त्यामुळे विरोचकाला राग येतो. तेवढ्यात तिथे केतकी काकू येतात आणि त्याला खोलीबाहेर जायला सांगतात.
आणखी वाचा – मेष, कर्क व मीन राशींसाठी बुधवारचा दिवस असेल शुभ, आर्थिक लाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या…
त्यानंतर सगळेजण स्वयंपाक घराच्या इथे सकाळच्या नाश्त्यासाठी भेटतात. तेव्हा सर्वजण एकमेकांशी बोलताना मी काय म्हणतो?/मी काय म्हणते? याचा वारंवार उच्चार करतात. विरोचकही तिथे असतो आणि तो हे सगळं ऐकत असतो. त्यानंतर तो उठून खोलीत येतो. तेव्हा शेखरही विरोचकला बालिश म्हणतो. त्यामुळे विरोचकाला राग येतो. तेवढ्यात तिथे तेजस येतो आणि तो मी काय म्हणतो असं म्हणतो. सर्वांच्या मी काय म्हणतो/मी काय म्हणते या बोलण्यावरुन आता विरोचकाला राजाध्यक्षांच्या वागण्याचा संशय येत आहे.
राजाध्यक्ष कुटुंबातील सगळेच जण वारंवार मी काय म्हणते किंवा मी काय म्हणतो हे वाक्य म्हणत आहेत. त्यामुळे या सर्व वाक्याचा विरोचकाचा प्रतिबिंब शक्तीशी काहीतरी संबंध असावा या संशयावरुन आता याचा वापर करावा असा विरोचक विचार करतो. त्यामुळे आता विरोचकाविरुध्द विणलेल्या जाळ्यात राजाध्यक्ष स्वतःच अडकणार का? की देवी आई त्यांना यातून काही वेगळा मार्ग दाखवणार? हे आगामी भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.