‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे अहिल्यादेवी आणि श्रीकांत डेटवर गेलेले असतात तेव्हा श्रीकांत खूपच खुश असतो श्रीकांत म्हणतो, आपण आईस्क्रीम खाऊन घरी जाऊ असं म्हणत तो आईस्क्रीम आणायला दुकानात जातो तितक्यात तिथे गाडी येते आणि श्रीकांतला पत्ता विचारते. श्रीकांत पत्ता सांगत असतो इतक्यात पाठीमागून एक माणूस त्याला त्या गाडीत ढकलतो आणि पळवून घेऊन जातो तर अहिल्यादेवी त्याला बघतच राहतात. त्यानंतर अहिल्यादेवी मोहनला फोन करून घडला प्रकार सांगते, ती गाडी श्रीकांतला घेऊन सरळ सूर्यकांत कदमकडे जाते. (Paaru Serial Update)
सूर्यकांत कदमला खूपच आनंद झालेला असतो तो म्हणतो की आता माझ्यामध्ये कोण येतंय तेच मी पाहतो आणि श्रीकांतला स्वतः समोर बसवून ठेवतो. तर इकडे अहिल्यादेवी मोहन बरोबर घरी येतात आणि घडला प्रकार पोलिस व वकिलांना सांगतात पोलिस त्यांना पोलीस प्रोटेक्शन देण्याबद्दल बोलतात मात्र त्या नकार देतात आणि सांगतात की, आम्ही आमची काळजी घेऊ त्यानंतर मोहन सांगतो की आपण पोलीस प्रोटेक्शन घ्यायला हवं होतं. यावर अहिल्यादेवी म्हणतात आत्ताच्या आत्ता सूर्यकांत कदमला फोन लाव त्यावर मोहन सूर्यकांत कदमला फोन लावतो तेव्हा तो जोर जोरात हसत असतो आणि सांगतो की, आम्ही श्रीकांत दादांची व्यवस्थित काळजी घेत आहोत. तुम्ही काही काळजी करू नका त्यावेळेला अहिल्यादेवी व सूर्यकांत यांच्यात बाचाबाची होते तेव्हा सूर्यकांत शेवटी सांगतो की, तुमच्याकडे फक्त १२ तासाची मुदत आहे. पुढील बारा तासात गावातल्या सर्व गावकऱ्यांच्या पेपर्सवर सह्या घेऊन माझ्यापर्यंत पोहोचवा आणि श्रीकांत दादाला घेऊन जा.
आणखी वाचा – शुक्रवारी मेष व मकरसह ‘या’ राशींचे भाग्य उजळणार, तुमच्या नशिबात नेमकं काय?, जाणून घ्या…
अहिल्यादेवींना आता सूर्यकांतने बारा तासांची मुदत दिलेली असते तर इकडे आदित्य प्रीतम पारू दिशा हरीश सगळेचजण परतीच्या प्रवासाला लागलेले असतात. त्यावेळेला मोहन आदित्यलाही फोन करून सर्व काही सांगतो. आदित्य आणि प्रीतम घरी आल्यानंतर अहिल्यादेवींना विचारतात की हे सगळं कोणी केलं. प्रीतम रागारागात म्हणतो आताच्या आता मला तू सांग मी त्याला जाऊन बघतो बाबांना हात लावायची हिंमत कशी झाली. अहिल्यादेवी सूर्यकांत कदमने हे सर्व केलं असल्याचं सांगतात. त्यानंतर आदित्य व प्रीतम तिथून निघून जातात. दोघेही फार कासावीस झालेले असतात. आता श्रीकांत सूर्यकांत कदमच्या तावडीत असतो. अहिल्यादेवींनी सूर्यकांतला शेवटी असं सांगितलेलं असतं की, श्रीकांत हे माझं प्रेम असलं तरी ते गाव आणि ते गावकरी माझं कर्तव्य आहेत. त्यामुळे मी सर्वप्रथम प्रेमा आधी कर्तव्य बजावणार हे ऐकल्यावर सूर्यकांत शांत होतो मात्र सूर्यकांतला माहिती असते की काही झालं तरी अहिल्यादेवी श्रीकांतला सोडवण्यासाठी त्या सह्या घेऊनच येणार.
आता बारा तासाच्या मुदती दरम्यान अहिल्यादेवी सूर्यकांतसमोर फाईल घेऊन जात असतात. आता ती फाईल नेमकी कोणती असणार, अहिल्यादेवींचा हा नवा डाव तर नसणार ना?, अहिल्यादेवी गावकऱ्यांच्या जमिनी देऊन श्रीकांतला सोडवणार का?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.