पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, आदित्य ब्रँडसाठी निवडलेल्या डोळ्यांच्या प्रेमात पडला असल्याचं प्रीतम अहिल्यादेवींना सांगतो मात्र आदित्य असं काहीच नसल्याचे सांगतो. त्याच वेळेला प्रीतम हरीशला विचारतो की, तू या डोळ्यांमागचा खरा चेहरा कोण आहे ते सांगणार होतास ना यावर हरीश सांगतो की, मी फोटो घेऊन आलोच आहे मात्र तुम्हीच बघा असं म्हणत प्रीतमच्या हातात फोटो देतो पण ते फोटो आणि ते डोळे काही एकमेकांशी जुळत नाहीत त्यावर अहिल्यादेवी म्हणतात की, हे डोळे तुझ्या या फोटोमधील नाही आहेत, पण जर या डोळ्यांवर कोणी कॉपीराईट लावलं तर आपल्याला खूप मोठा फटका बसेल यावर हरीश सांगतो की, मी लवकरात लवकर ते डोळे कोणाचे आहे ते शोधून काढतो. (Paaru Serial Update)
तर अहिल्यादेवी सांगतात की, माझा आदित्य मी सांगेन त्याच मुलीशी लग्न करेल माझा विश्वास आहे त्याच्यावर. यानंतर प्रीतम ते डोळे अहिल्या देवींच्या हातात देत सांगतो की, तू बघ हे डोळे इतके सुंदर आहेत की तू विचार कर या डोळ्यांचा आणि दादाला सांग म्हणजे तो लग्न करून मोकळा होईल. तेव्हा अहिल्यादेवी ते डोळे बघते तेव्हा ते डोळे अहिल्यादेवींना सुद्धा आवडतात अहिल्यादेवी सांगतात की, हरीश या डोळ्यांमागचा खरा चेहरा कोण आहे ते मला सांग मग मुलगी चांगली असली तर आपण विचार करू. तेवढ्यात दिशा चुकली करते आणि सांगते की सासू मॉम मी तुम्हाला काही फोटो पाठवले होते ते तुम्ही पाहिले का दिशानं आदित्य आणि पारुचे सोहळ नेसावतानाचे काही फोटो शेअर केलेले असतात ते पाहून अहिल्यादेवी दिशाला घेऊन बाजूला जातात आणि विचारतात की, हे फोटो पाठवण्यामागचा तुझा हेतू काय होता यावर दिशा सांगते की, ती खूपच आदित्यच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते ती मेड आहे त्यामुळे तिने तसेच अंतर ठेवून राहायला पाहिजे. तिचा सगळ्यांमध्ये मागे मागे करण्याचा उद्देश्य असतो असं मला वाटतं.
यावर अहिल्यादेवी पारूची बाजू घेत दिशाला शांत राहायला सांगतात. त्यानंतर अहिल्यादेवी मारुतीला बोलावून घेतात आणि पारूलाही बोलवतात आणि सांगतात की, हरीश बरोबर तुझं लग्न करायचं ठरवलं आहे तू हरीश बरोबर लग्न करायला तयार आहेस का हे तू मला संध्याकाळपर्यंत सांगशील?, आणि त्या तिथून निघून जातात. तर तिकडे हरीश व आदित्य बोलत असतात तेव्हा आदित्य हरीशला विचारतो की, तू या लग्नासाठी तयार आहेस ना? यावर हरीशही पारूची स्तुती करत होकार देतो तर हरीश सांगतो की, मी एकदा पारूशी बोलून घेतो म्हणजे जे काय असेल ते समोर समोर होऊन जाईल. त्यानंतर इकडे दिशा आणि दामिनी पारूची फिरकी घ्यायचं ठरवतात आणि खोटं खोटं सांगून आदित्यने कॉफी मागितली असल्याचे सांगतात. आणि अहिल्यादेवी समोर दामिनी नाटक करते की, मी तिच्याकडे चहा मागितला पण हिने मला चहा दिला नाही आणि आता कॉफी घेऊन जात आहे. यावर अहिल्यादेवी दुर्लक्ष करतात.
तर रूममध्ये गेल्यावर आदित्य आणि पारू बोलत असतात तेव्हा आदित्य पारुला लग्नाविषयी सांगतो आणि हरीशबद्दल विचार करायला सांगतो. आईची निवड चुकणार नाही असा विश्वास तो पारूला दाखवतो. त्यानंतर पारू तिथून निघून जाते. आता मालिकेच्या पुढील भागात पारू हरीशबरोबर लग्नाला तयार होणार का?, अहिल्यादेवींना ती काय उत्तर देणार?, हे सर्व पाहणं रंजक ठरणार आहे.