‘झी मराठी’वरील ‘पारू’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत असतात. मालिकेत एका मागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. पारूचा ब्रँड अँबेसिडर होण्याचा प्रवास सुरु झालेला पाहायला मिळत आहे. तर एकीकडे तिची लगीनघाई सुद्धा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. दिशा व दामिनी यांनी मिळून पारूला अद्दल शिकवण्यासाठी आखलेला हा लग्नाचा डाव सध्या मालिकेत सुरु आहे. पारू लग्नासाठी तयार झालेली असून ती आदित्य व प्रीतमला काही भेटवस्तू देत त्यांचा निरोप घेते. (Paaru Serial Update)
मात्र आदित्य पारुला आम्हाला तुझ्या जेवणाची आठवण येईल असं म्हणत तिला मिस करणार असल्याचे म्हणतो. पारू आदित्य कडून वचन घेते की, “मी तुम्हाला केव्हाही फोन केला तरी तुम्ही माझा फोन उचलाल. तुम्ही कितीही कामात असलात तरी माझा फोन उचलाल का?”, असा प्रश्न ती विचारते. तर एकीकडे दिशा पारूच्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजेच अजयला चांगलच सुनावते. खोटे आई-बाबा चांगले तरी आणायचे असं ती म्हणते. यावर तो मी त्यांची चांगली प्रॅक्टिस करून घेईन असं म्हणतो.
त्यानंतर दिशा अजयला “तुला एक गावंडळ मुलगी सांभाळता येत नाही यावरुन खूप बोलते. आता तरी तू तुझ्यातला पुरुषार्थ दाखव. यापुढे तिने तुझ्याकडे कधीही मान वर करुन पाहिलं नाही पाहिजे”, असं सांगते. हे ऐकून अजयची तळपायाची आग मस्तकात जाते आणि अजय रागारागात दिशाला बोलतो की, उद्या पारूचा शेवटचा दिवस आहे. ती इथून गेली की परत घरी परतणारच नाही याची काळजी मी घेईन”. यावर दिशा म्हणते, “ही गुडन्यूज ऐकायला माझे कान तृप्त झाले आहेत”.
आता मालिकेच्या येणाऱ्या भागात अजय व पारू बाहेर जातात. तेव्हा अजय पारूबरोबर काही वाईट करणार का?, पारूचं काही वाईट होणार का?, की पारू अजयपासूनच्या संकटातून वाचणार?, हे सर्व पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरणार आहे.