‘इट्स मज्जा’च्या ‘आठवी-अ’ या सीरिजला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. डोंगरावरच्या एका छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या आभ्या व त्यांच्या खास मित्रांची साधी तरी प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट या सीरिजद्वारे दाखवण्यात आली होती. महाराष्ट्रातील अनेक गावांमधून व शहरांमधून या सीरिजला लोकप्रियता मिळाली होती. पण अखेर २५ भागांनंतर या सीरिजने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र या सीरिजच्या निरोपाबरोबरच ‘इट्स मज्जा’ने ‘दहावी-अ’ या आगामी सीरिजची घोषणा केली होती. तेव्हापासून अनेकांना ‘दहावी-अ’ची उत्सुकता लागून राहिली होती. अशातच नुकतीच ६ जानेवारीपासून ‘दहावी-अ’ ही सीरिजही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. (Dahavi-A first episode crossed one million views)
दर सोमवारी व गुरुवारी दुपारी १.३० वाजता ‘इट्स मज्जा’च्या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. दहावीच्या वर्षात घालवलेल्या प्रत्येक खास आठवणींची शिदोरी घेऊन अनेकजण आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करतो. याच आठवणींचं भावविश्व ‘दहावी-अ’ सीरिजमधून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सीरिजचा पहिला भाग सोमवार, ०६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि अवघ्या काही क्षणातच या पहिल्या भागाने मिलियन व्ह्युजचा टप्पा पार केला आहे. अवघ्या ४८ तासांमध्ये ‘दहावी-अ’च्या पहिल्या भागाने १ मिलियन व्ह्युजचा यशस्वी टप्पा पार केला आहे आणि ही व्ह्युजची ही यशस्वी घोडदौड अजूनही सुरुच आहे.
‘दहावी-अ’च्या पहिल्या भागाला १ मिलियनहून अधिक व्ह्युज, अठराशेहून अधिक कमेंट्स आणि जवळपास सत्तर हजरांच्या जवळपास लाईक्स मिळाले आहेत. एकूणच दहावी-अ ही सीरिज प्रेक्षकांचे मन जिंकण्यात हळूहळू यशस्वी होत आहे. अवघ्या कमी कालावधीतच या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून तूफान प्रतिसाद मिळाल्यामुळे आता या सीरिजच्या आगामी भागांची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे आभ्या, विक्या, किरण्या, मध्या, रेश्मा व केवडा यांच्या आयुष्यात ‘दहावी-अ’च्या वर्षात काय-काय बदल होणार? हेही लवकरच पाहायला मिळेल.
आणखी वाचा – 09 January Horoscope : मेष, वृषभ व मकर राशीच्या लोकांना गुरुवारी चांगली बातमी मिळेल, जाणून घ्या…
दरम्यान, या पहिल्या भागात सुरुवातीला आभ्या, विक्या, किरण्या व मध्या हे चौघे इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना पाहायला मिळाले. इंग्रजी विषयावरुन या मित्रांमधली मजामस्ती या सीनमध्ये पाहायला मिळाली. पुढे रेश्मा व पल्लवीची आई रेश्माला त्यांच्या लग्नाविषयी सांगतात. रेश्मा व पल्लवीची आई रेश्माला दहावी होताच रेश्माचं लग्न लावणार असल्याचे म्हणतात. यामुळे रेश्मा काहीशी नाराज होते. त्यामुळे आता दुखावलेल्या रेश्माचे मन आभ्या समजू शकेल का? आणि केवडा व आभ्या यांच्या नात्यात आणखी काय नवीन वळण येणार? हे आगामी भागातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.