IIT Aspirant Wants To Runaway From Home : सोशल मीडियावर आयआयटीची तयारी करणाऱ्या एका विदयार्थ्याच्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ती अभ्यास करीत आहे की नाही हे पाहण्यासाठी पालकांनी तिच्या खोलीत कॅमेरा लावला. मुलीने ऑनलाईन पोस्टमध्ये सांगितले की, ‘जेव्हा पालकांनी तिच्या खोलीत कॅमेरे बसवले तेव्हा तिला प्रचंड राग आला, परंतु ती काही बोलू शकली नाही. जेव्हा तिने आपली खोली बदलली, तेव्हा पालकांनी तिथेही कॅमेरा ठेवला’. शेवटी तिने असे लिहिले की, “आता मी केव्हा मोठी होतेय आणि या घरापासून पळून जातेय याची मी वाट पाहत आहे. आता मी माझ्या पालकांना सहन करु शकत नाही”.
ही पोस्ट शेअर करत पालकांचे प्रशिक्षक हरप्रीत सिंग ग्रोव्हर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, अशी अनेक मुले आहेत ज्यांचे आयआयटी क्लिअर झाले आहेत, परंतु ते वर्गात उपस्थित राहत नाहीत. आणि मग तक्रारी पालकांकडे जातात. आता पालकांना हे कधी कळणार की मुलांना अभ्यासाची इच्छा मारुन नाहीतर आतून निर्माण झाली पाहिजे. जर आपल्याला ही भावना आपल्या मुलाच्या मनावर कधीही येऊ नये असे वाटत असेल तर कोणत्याही परीक्षेची तयारी करण्यापूर्वी त्याच्या आवडीबद्दल निश्चितच माहिती असावी”.
आणखी वाचा – “९९% काश्मिरी हे भारताशी निष्ठावान”, जावेद अख्तर यांचं मोठं विधान, म्हणाले, “पहलगाम हल्ला…”
जर आपला मुलगा कंटाळा न करता बर्याच दिवसांपासून एखाद्या विषयाचा अभ्यास करत असेल तर त्याला तो विषय आवडतो हा एक संकेत आहे. त्याच्याकडे याबाबत प्रश्न विचारुन त्याची आवड जाणून घेऊ शकता. जर आपल्या मुलाने त्या विषयाशी संबंधित प्रश्न विचारले किंवा त्यामध्ये काहीतरी नवीन जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली तर समजून घ्या की आपला निर्णय योग्य आहे. परंतु जर हे असे दिसत नसेल तर मुलाची आवड ओळखण्याचा प्रयत्न करा.
आणखी वाचा – “मीसुद्धा माझी लघवी प्यायली आहे”, परेश रावलनंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा दावा, म्हणाली, “सुंदर त्वचेसाठी आणि…”
जर मुलाने इतरांनी शिकलेल्या गोष्टी सखोलपणे स्पष्ट केल्या तर त्या विषयावर त्याला रस आहे हा एक मुद्दा आहेच. इतकेच नव्हे तर त्या विषयाबद्दल देखील पूर्ण आत्मविश्वास आहे. जो विषय पालकांना मुलांनी करावा असं वाटत आहे त्याबाबत मुलांना रुची नसेल तर तो विषय मुलांपासून दूर न्या. अशा परिस्थितीत पालकांनी त्यांचा निर्णय मुलांवर लादू नये. सक्तीने घेतलेला विषय केवळ मुलांचा वेळ वाया घालवत नाही तर मनही वळवते. एखाद्या विषयात अडचणीनंतरही मूल त्यात कठोर परिश्रम करीत असेल तर ते त्याच्या तीव्र उत्सुकतेचे आणि उत्कटतेचे लक्षण आहे. परंतु जर हे असे दिसत नसेल तर आपण आपल्या निर्णयावर पुन्हा पुनर्विचार केला पाहिजे.





