Nikki Arbaaz breakup news : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अनेक स्पर्धकांची जवळीक पाहायला मिळाली. यांत निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल ही दोन नावे नेहमीच चर्चेत राहिली. ‘बिग बॉस’च्या घरात असताना त्यांच्यात प्रेमाचे नाते तयार झाले आणि ‘बिग बॉस’संपल्यावरही ही जोडी बरेचदा एकत्र पाहायला मिळाली. अभिनेत्री निक्की आणि अरबाज यांच्या नात्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याचं समोर आल्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.
या चर्चांदरम्यान निक्कीने केलेली एक पोस्ट विशेष लक्ष वेधून घेत आहे. “अफेअर्स केवळ एखादी नवीन व्यक्ती खूप आकर्षक असते म्हणून होत नाहीत; तर ते तेव्हा होते जेव्हा भूतकाळातील एखादी व्यक्ती दिलेली वचने पाळणे थांबवते”, असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टचा संदर्भ नेमका कोणाकडे आहे, याबाबत निक्कीने कोणतंही स्पष्ट वक्तव्य केलेलं नाही.
आणखी वाचा – कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

दुसरीकडे, अरबाजनेही सोशल मीडियावर फसवणुकीबाबत भाष्य करणारी पोस्ट शेअर केली आहे. “आपल्या जोडीदाराची फसवणूक करणे आणि त्यानंतर घरी येऊन त्याच्या डोळ्यात पाहून ‘मी तुझ्यावर प्रेम करतो/करते’ असे म्हणणे हा अनादराचा एक वेगळाच आणि अत्यंत खालच्या पातळीचा प्रकार आहे. जे म्हणायचे होते, ते मी स्पष्टपणे म्हटले आहे,” असं म्हणत त्याने एकप्रकारे निक्कीच्या पोस्टला उत्तर दिले आहे.
आणखी वाचा – ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली
दोघांच्या पोस्टचा काळ आणि त्यांनी एकमेकांना अनफॉलो केल्याची बाब पाहता, त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर जोर आला आहे. मात्र, या पोस्टमधून दोघांनीही एकमेकांवर थेट आरोप केले आहेत, असं स्पष्टपणे म्हणता येत नाही. निक्की आणि अरबाज यांचं ब्रेकअप नेमकं कशामुळे झालं, याबाबत दोघांकडूनही अद्याप अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील पोस्टच्या आधारे सुरू असलेल्या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, हे त्यांच्या अधिकृत वक्तव्यानंतरच स्पष्ट होईल.




