Saleel kulkarni Celebration For National Award: देशातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कारांपैकी एक असलेल्या ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा नुकतीच झाली आहे. ज्यामध्ये अनेक मराठी, हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांनी महत्वाच्या पुरस्कारांवर नाव कोरलं आहे.नेहमीप्रमाणे यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी आपली छाप पाडली आहे. ‘गोदावरी’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. तर, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार सलील कुलकर्णी यांच्या ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाने पटकावला आहे.(Saleel kulkarni Celebration For National Award)
‘एकदा काय झालं’ या चित्रपटात डॉ. सलील कुलकर्णी यांनी एका गोष्ट सांगणाऱ्या बाबाची कहाणी सादर केली आहे.या चित्रपटाचं लेखन,पटकथा,संवाद,संगीत व दिग्दर्शन डॉ. सलील कुलकर्णी यांनी केलं आहे.या चित्रपटात अभिनेता सुमित राघवन, मोहन आगाशे, पुष्कर श्रोत्री, अभिनेत्री उर्मिला कानेटकर, सुहास जोशी यांसारखे अनेक दिग्ज कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले.चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर डॉ.सलील कुलकर्णी यांनी कुटुंबासोबत हे यश साजरं केलं.
सलील कुलकर्णी यांनी केलं खास सेलिब्रेशन (Saleel kulkarni Celebration For National Award)
या सेलिब्रेशनचा व्हिडिओ डॉ.सलील यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केला आहे.या पोस्टच्या कॅप्शन मध्ये त्यांनी म्हंटल आहे, “राष्ट्रीय पुरस्काराच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली.Best Marathi feature Film – एकदा काय झालं.राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यापासून मुंबईत ‘सा रे ग म प’च शुटींग चालु होतं.आज पुण्यात घरी आलो आणि आई , माझी बहीण आसावरी , मावशी , शुभु ह्यांना इतकं आनंदात बघुन पुरस्काराचा आनंद द्विगुणित झाला.आईला आपलं कौतुक वाटावं आणि आपल्या मुलांना आपला अभिमान ..” याहुन वेगळं समाधान नाही .याजसाठी केला होता अट्टाहास’ तसेच त्यांनी अनेकांचे आभार मानले आहेत तर या सिलेब्रेशनसाठी उपसस्थित नसणाऱ्यांना मिस केलं आहे.
अनेकांनी कमेंट करत सलील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच ‘एकदा काय झालं’ चित्रपटाच्या निमित्ताने डॉ.सलील यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता सुमित राघवनची निवड कशी केली याबद्दल सांगितलं होत. सलील म्हणाले,”सलीलनं सांगितलं होतं, फिल्ममेकिंग करणं हे अवघड काम आहे. मी संगीतकार म्हणून काम करत होतो. मी विविध कार्यक्रमांचे परीक्षण करत असताना कॅमेरा अँगल्स आणि इतर गोष्टींचे निरीक्षण करत होतो. जेव्हा मी ‘एकदा काय झालं’ या सिनेमाच्या निर्मितीचा विचार करत होतो तेव्हा मला या चित्रपटातील गोष्टी सांगाणारा माणूस हा सुमीत राघवन साकारु शकतो असं वाटलं'(ekda kaay zala movie)