Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सुरुवातीपासून प्रेम व मैत्रीचे बंध पाहायला मिळाले. निक्की अरबाज व वैभव इरिना यांच्यातील मैत्री ही जग जाहीरच आहे. तसंच निक्की व अरबाज यांच्यात आलेल्या तिसऱ्या व्यक्तीमुळे झालेले वाद व भांडणं हीदेखील प्रेक्षकांना काही नवीन नाहीत. निक्की-अरबाज यांच्यातील ही तिसरी व्यक्ती कोण? तर अभिजीत सावंत. अभिजीतमुळे निक्की-अरबाज यांच्यात अनेकदा लुटपुटूची भांडणं झाली आहेत. अशातच आता त्यांच्यात अभिजीतमुळे पुन्हा एकदा दुरावा येणार की काय? हे पाहायला मिळणार आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनला आता चार आठवडे पूर्ण होत आहेत. गेल्या चार आठवड्यात सदस्यांना ‘बिग बॉस मराठी’चा खेळ खऱ्या अर्थाने कळला आहे. आता घरातील सदस्यांची समीकरणेदेखील बदलत आहेत. त्यामुळे या नव्या सीझनची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. आता अभिजीतमुळे निक्की-अरबाज यांच्यात दुरावा येणार असल्याचं म्हटलं जात आहे. निक्की-अभिजीतची मैत्री अरबाजला खटकत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. अरबाजने याबद्दल आक्षेपही नोंदवला आहे.
अशातच आता ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज निक्कीला म्हणत आहे, “तुम्हाला चांगलं वाटतंय तर तुम्ही एकमेकांबरोर दिवसभर बोला”. निक्की पुढे अभिजीतला म्हणते की, “त्याचं म्हणणं हेच आहे की, आम्ही सगळे याच्या विरोधात आहोत. तर तू का नाही आहेस?”. तर दुसरीकडे अरबाज अंकिताला म्हणतो की, “अभिजीत समोर असेल तर कृपया तू मध्ये येऊ नकोस. आता मी त्याला भिडणार आहे”. निक्की व अभिजीतची ही मैत्री अरबाजला चांगलीच खटकत असल्याचं पाहायला मिळत आहे.
त्यामुळे आता निक्की-अरबाज दुरावणार का? की अभिजीतही त्याच्या टीमपासून वेगळा होणार? अभिजीत-निक्कीची मैत्री अरबाजसह आणखी कोणाला खटकणार का? आणि या मैत्रीमुळे घरातील वातावरण कसं राहणार हे आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.