‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. ही मालिका गेल्या १५ वर्षांहून अधिक काळापासून सुरु आहे आणि आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या मालिकेमधील प्रत्येक पात्राला लोकांचे भरपूर प्रेम मिळाले आहे. याच कारणामुळे ही मालिका बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. या मालिकेत अनेक कलाकार आले आणि गेले पण लोकांनी सर्वांना खुल्यामनाने स्वीकारले आणि सर्वांना भरभरुन प्रेम दिले. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये टप्पू तीनदा बदलला आहे. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Nitish Bhaluni)
भव्य गांधी याने ही भूमिका साकारली होती. त्यानंतर राज अनाडकटने ही भूमिका साकारली आणि आता नितीश भलुनी ही भूमिका साकारत आहेत. नितीश या मालिकेसाठी भरपूर मानधन घेत असल्याचं समोर आलं आहे. त्यांची फी ऐकून सर्वांना धक्का बसेल. अभिनेत्याच्या फीबद्दल बोलायचे झाले तर त्याची फी भव्यपेक्षा १००% जास्त आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सुरु झाली तेव्हा हे पात्र भव्य गांधींनी साकारले होते. भव्यने ही भूमिका २००८ ते २०१७ या काळात केली होती. त्यानंतर त्याने हा शो सोडला कारण त्याला चित्रपटात नशीब आजमावायच होता. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, एका एपिसोडसाठी भव्यची फी १०,००० रुपये इतकी होती. २०१७ मध्ये भव्यची जागा राज अनाडकटने घेतली. जेव्हा त्याने भव्यची जागा राजने घेतली तेव्हा टप्पूच्या पात्राची फी वाढली. राजला एका एपिसोडसाठी २० हजार रुपये मिळायचे. राजचा पगार भव्यपेक्षा दुप्पट होता. पाच वर्षे हे पात्र साकारल्यानंतर राजनेही हा शो सोडण्याचा निर्णय घेतला.
आता नवीन टप्पू म्हणजेच नितीश भालुनी टप्पूचा वारसा पुढे नेत आहे. त्याला राज सारखाच पगार मिळत आहे. कोइमोईच्या रिपोर्टनुसार, नितीशला एपिसोडसाठी २०,००० रुपयेही मिळत आहेत. नितीशवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. टप्पूची भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक अभिनेत्याला प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दिली. त्यामुळे तो नेहमीच सर्वांचा लाडका राहिला आहे.