मराठी मालिका विश्वात गेले काही महिने वर्चस्व गाजवणारी मालिका म्हणजे आई कुठे काय करते. मनोरंजन विश्वात या मालिकेने एक वेगळं स्थान निर्माण केलं. अनिरुद्ध-अरुंधती यांचा 25 वर्षांचा संसार अचानक मोडतो. एकत्र कुटुंबात राहणाऱ्या देशमुखांच्या घरात यामुळे वादळ येतं. पण आता अरुंधतीच्या लग्नामुळे आई कुठे काय करते ही मालिका TRP मध्ये अनेक आठवडे वरच्या स्थानावर आली. या मालिकेला सोशल मीडियावरसुद्धा खूप प्रेक्षक फॉलो करतात.(Aai Kuthe Kaay Karte)
या मालिकेने मागील काही दिवसांपासून प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. मालिकेत सध्या आईचं म्हणजेच अरुंधतीच्या लग्नाचा ट्रक पाहायला मिळतोय. अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न अखेर आप्पा आणि यशच्या साथीनं पार पडतंय. देशमुखांच्या घरातील अनिरुद्ध, अभि आणि कांचन असे काहीजण सोडले तर संपूर्ण घर अरुंधतीच्या लग्नासाठी एकत्र आलं.सध्या सुरू असलेल्या ट्रकमध्ये लग्नात कांचन आई नसल्यामुळे अरुंधती खचून जाते. त्यामुळे अनेकजण अरुंधतीची समजूत काढतात. पण कांचन अखेर अरुंधतीच्या लग्नाला होकार देणार आहे.तर अनिरुद्धच्या देखील राग अनावर होतो, अनिरुद्ध एक वेळ अरुंधती जग सोडून गेली असती तर मला चाललं असत, पण ती सूर्य कोणासोबत लग्न करते हे मला बघवत नाही असं तो अभिला म्हणतो
=====
हे देखील वाचा- IIT मद्रासमध्ये घुमणार ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या’ नावाचं वादळ
=====
अरुंधतीच जरी हे दुसरं लग्न असलं तरी मेहंदी, हळद, चुडा भरणे अशा सगळ्या विधी या लग्नात देखील पाहायला मिळाल्यात.अरुंधतीच्या लग्नासाठी अविनाश, केदार ,गौरी देखीलआले आहेत . त्यामुळे देशमुखांच्या घरी आंनदाच वातावरण आहे पण आता फक्त एकटी कांचन या लग्नाला नसल्यानं अरुंधती नाराज आहे. पण कांचन स्वत: अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाला येणार असून दोघांचं कन्यादान देखील करणार आहे.(Aai Kuthe Kaay Karte)
कांचन आई अरुंधतीच्या लग्नासाठी तयार
मालिकेचा नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे. ज्यात इतके दिवस अरुंधतीच्या विरोधात बोलणारी,तिला सतत टोमणे मारणारी कांचन आई अखेर अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नासाठी तयार झाली.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये , देशमुखांच्या घरात अरुंधती आणि आशुतोषचं लग्न लागतं. दोघांचा कन्यादानाचा विधी सुरू होतो. तेव्हा गुरूजी आप्पांना “तुम्ही कन्यादानासाठी पत्नीला बोलवा” असं म्हणतात. “कांचन येणार नाही”, असं आप्पा गुरूजींना सांगतात तेवढ्यात कांचन घरात येते. “थांबा, माझ्या मुलीचं कन्यादान करायला तयार आहे मी”, असं म्हणते. कांचनच्या डोळ्यात पाणी येतं. कांचनचा हा निर्णय ऐकून अरुंधतीसह सगळेच आनंदी होतात. त्यानंतर आप्पा आणि कांचन स्वत:च्या हातानं आपल्या लेकीचं म्हणजेच अरुंधतीचं कन्यादान करतात.(Aai Kuthe Kaay Karte)
अखेर सासू सुनेचं लग्न लावून देणार हे पाहून अनेक चाहते सुखवले.तर आता पुढे देखील कांचन आई या अरुंधतीशी चांगल्या वागणार का?, आणि अरुंधतीच्या विवाही आयुष्यात अनिरुद्ध काय घोळ घालणार हे पाहणं आता रंजक ठरेल.