‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अहिल्यादेवी देवाचे दर्शन घेऊन सावित्री व दिशाला प्रसाद देतात आणि दिशाला सांगतात की, पुढच्या वर्षी तुला सुद्धा वटपौर्णिमेची पूजा करायची आहे. तर इकडे हरीश गावात झालेल्या कॅम्पेनचे फोटो घेऊन आलेला असतो त्या वेळेला त्या फोटोमध्ये प्रीतमला गावाकडच्या मास्तरीन बाईंचा फोटो मिळतो. तो पाहून प्रीतम खूप खुश होतो आणि सांगतो की, माझं यांच्यावर एकतर्फी प्रेम आहे. मला यांचं नावही माहिती नाही, तरीसुद्धा मी यांच्या प्रेमात पडलो आहे. जर माझ्या नशिबात या असतील तर त्या कुठून ना कुठून माझ्यासमोर येतील. तर हे पारू सुद्धा ऐकते. (Paaru Serial Update)
पारू त्यांना दिशा बरोबर तुमचा साखरपुडा झाला आहे, यावरून बरंच काही ऐकवते. मात्र प्रीतम त्यांचे काहीच ऐकून घेत नाही. त्यानंतर पारू हरीशच्या हातात ज्यूस देते. तो ज्यूस पाहून हरीशला काहीतरी आठवू लागतं. त्यावर हरीश सांगतो की, अस ज्यूस प्यायल्यावर मी बेशुद्ध झालो. त्या ज्यूसमध्ये काहीतरी कोणीतरी मिसळलं होतं पण तो ज्यूस कोणी आणून दिला आहे हे हरीशला आठवत नसतं. तर इकडे दामिनीला तिच्या मैत्रिणींबरोबर पार्टीला जायचं असतं आणि मोहनकडून ती त्याची परवानगी सुद्धा घेत असते तितक्यात अहिल्या देवी येतात आणि अहिल्यादेवी सांगतात की, दामिनी तुला वटपौर्णिमेचा उपवास करावाच लागेल. आणि इथे फक्त अहिल्यादेवींचा शब्द चालतो त्यामुळे तुला किर्लोस्करांची प्रथम मोडून चालणार नाही.
त्यानंतर पारू तिच्या जास्वंदाच्या झाडाबरोबर बोलत असते तेव्हा ती म्हणते की, मला काही करुन वटपौर्णिमेचा उपवास धरावाच लागेल. आदित्य सरांच्या दीर्घायुष्यासाठी मला हे करणं भाग आहे. हो मी सगळ्यांची फसवणूक करत आहे, हरीश सरांचीही या लग्नामुळे फसवणूक होणार आहे आणि हे मला पटत नाही आहे. फसवणुकीबद्दल दिशा व दामिनी ऐकतात आणि विचारतात की, तू कोणत्या फसवणुकीबद्दल बोलत आहेस. यावर पारू जराशी गोंधळते. तितक्यात दामिनी म्हणते की, त्या ऍडशूटसाठी हरीश ऐवजी आदित्य बसला त्यामुळे हरीशची फसवणूक केली आहे, असं तुला म्हणायचं आहे का?, यावर पारी पारू लगेच होकार देते. तेव्हा दिशा दामिनीवर चिडते आणि म्हणते की, तिला बोलू दे ना, तू कशाला सगळं काही सांगतेस आणि असं म्हणून तिथून निघून जाते.
आणखी वाचा – सर्वार्थ सिद्धी योगामुळे गुरुवारचा दिवस खूपच खास, प्रत्येक कामात मिळेल यश, जाणून घ्या…
आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, आदित्यला अचानक पुन्हा बरं वाटत नसतं त्यावेळेला पारू आदित्य जवळ येते आणि मनात म्हणते की, मी नुसता उपवास धरायचा की नाही याचा विचार करत बसले तर आदित्य सरांची तब्येत अचानक खालावली म्हणजे मला काही करुन हा उपवास धरायलाच हवा. आता पारूच्या उपवासात काही अडथळे येणार का?, उपवासाचं सत्य सगळ्यांसमोर येणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.