‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, पारू किचनमध्ये काम करत असते तेव्हा सावित्री आत्या पारूला मॅडम तुम्ही काम करु नका असं सांगते. यावर पारू सावित्रीला विचारते की, तुम्ही मला मॅडम का म्हणत आहात. मी तुमची पारू आहे. तुम्ही मला आधी सारखंच पारू म्हणा ना. यावर सावित्री म्हणजे आता ते शक्य नाही कारण तुम्ही आमच्या मालकीण आहात. अहिल्यादेवीनंतर किर्लोस्करांचीचा कोणी आदेश पाळणार असेल तर त्या तुम्ही आहात त्यामुळे मला हे शक्य नाही. तितक्यातच तिथे दामिनी येते मात्र दामिनीने काही ऐकलेलं नसतं. तर तिला पाहून पारू व सावित्रीला घामच फुटतो. तेव्हा दामिनी ऑर्डर सोडते आणि सांगते की, मला आत्ताच्या आता पाणी हवं आहे. तेव्हा पारू पाणी द्यायला जाते सावित्री तिला थांबवते आणि सांगते की मॅडम तुम्ही थांबा मी पाणी देते. हे दामिनी ऐकते आणि दामिनी म्हणते तू हिला काय म्हणालीस मॅडम. ही कोणत्या अँगलने मॅडम आहे यावर पारू बाजू सांभाळत म्हणते की, त्या मला कधी कधी मस्करीत मॅडम असे म्हणतात. (Paaru Serial Update)
दामिनी पारुला धमकी द्यायला आलेली असते की, त्या आदित्य आणि प्रीतमला तोड बंद ठेवायला सांग आणि यात माझं नाव कुठे यायला नाही पाहिजे असं सांगून तिथून निघून जाते. तेव्हा पारू त्यांना आदित्यला सर्व सांगूदे असं सांगते आणि कधी ना कधी त्यांना हे कळणार आहे ना असंही सांगते. तर इकडे आदित्य आणि प्रीतमला खूप टेन्शन आलेलं असतं की आता सगळं आईसमोर कसे सांगणार. अहिल्यादेवी घरी येतात तेव्हा त्या काळोख करुन बसलेल्या असतात. आदित्य प्रीतम यांना टेन्शन आलेलं असतं की, तेव्हा अहिल्यादेवी सांगतात लाईट लावू नका काय बोलायचं आहे ते आत्ताच बोल. तर आदित्य म्हणतो की, आई तुला मला काहीतरी सांगायचे आहे आणि ते सांगायला थोडा उशीरच झाला आहे. यावर अहिल्यादेवी म्हणतात हो, मला फार राग आला आहे आणि मला सर्व काही माहिती आहे, असे सांगतात.
अहिल्यादेवी आदित्यजवळ उठून येतात आणि त्याला घट्ट अशी मिठी मारतात आणि म्हणतात की, मला तुझा अभिमान आहे. आपल्या जाहिरातीला इंटरनॅशनल अवॉर्ड जाहीर झाला आहे आणि तो उद्याच आहे हे ऐकल्यावर आदित्यच्या पायाखालची जमीन सरकते. तिकडे सगळेच जण असतात आणि लाईट लागते तेव्हा दिशा, श्रीकांत, दामिनी, मोहन सगळ्यांना एकत्र उभं असलेलं पाहून आदित्यला धक्का बसतो. आदित्य म्हणतो की, आई मला तुला काहीतरी वेगळं सांगायचं आहे तितक्यात दिशा मध्येच येते आणि अहिल्यादेवींना सिंगापूरच्या फ्लाईटबद्दल सांगते. सिंगापूरला मीटिंगनिमित्त श्रीकांत व अहिल्यादेवींना जावं लागतं आणि त्या तशाच निघून जातात. आदित्यचं त्यामुळे आजही सांगणं राहून गेलेलं असतं त्यामुळे त्याला फार वाईट वाटतं आणि तो पश्चाताप व्यक्त करतो. तर इकडे दिशा व दामिनी एकत्र असतात तेव्हा दिशा सांगते की, हे आमंत्रण तर पंधरा दिवस आधी आलं होतं पण मी कोणाच्या हाती ते लागू दिले नाही.
आता जेव्हा अहिल्यादेवींना बाहेरून आदित्यच्या या करामतीबद्दल कळेल तेव्हाच खरी मजा येईल असं सांगून ती तिथून निघून जाते. तर इकडे आदित्य त्याच्या आईला फोन करत असतो मात्र अहिल्यादेवी काही त्याचा फोन उचलत नाहीत. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात या अवॉर्ड फंक्शनसाठी आदित्य पोहोचणार का?, हे सगळं पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.