Mumtaz On Interfaith Marriage : ७०-८0 मध्ये मुमताज चित्रपटसृष्टीतील एक असे नाव होते, ज्यांनी एकापाठोपाठ अनेक चित्रपट दिले. तिची आणि राजेश खन्ना यांची जोडी पडद्यावर हिट ठरली. त्यांनी एकत्र अनेक हिट चित्रपट दिले आहेत, ज्यासाठी ते आजही स्मरणात आहेत. मुमताजने बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. तिचा पहिला हिट चित्रपट १९६७ मध्ये आला होता, ज्यामध्ये तिच्यासोबत दिलीप कुमार होते. त्याचे शीर्षक होते ‘राम और श्याम’. हा तिच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट होता पण लवकरच अशी वेळ आली जेव्हा तिने स्वतःला पडद्यापासून दूर केले. यावर मुमताजने वर्षांनंतर बोलले असून, त्यावेळी तिच्याकडे कोणताही पर्याय नव्हता असे सांगितले.
वास्तविक मुमताजने १९७४ मध्ये गुजराती हिंदू उद्योगपती मयूर माधवानीसोबत लग्न केले होते आणि चित्रपटांपासून दूर राहून ती लंडनमध्ये स्थायिक झाली होती. त्यांचा विवाह आंतरधर्मीय होता, त्यामुळे त्यावेळी त्याची बरीच चर्चा झाली होती. पण, या नात्याबाबत अभिनेत्री किंवा तिच्या कुटुंबीयांनाही काही हरकत नव्हती. अशा परिस्थितीत वर्षांनंतर अभिनेत्रीने तिच्या करिअरच्या शिखरावर असताना आणि आंतरधर्मीय विवाह नंतर इंडस्ट्री सोडल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विक्की ललवानी यांच्याशी त्यांनी संवाद साधला.
आणखी वाचा – भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स
विक्की लालवानीसोबतच्या संवादात मुमताज म्हणाली, “माझ्याकडे त्यावेळी कोणताही पर्याय नव्हता. माझी आई, आजी आणि काकूंनी हा प्रस्ताव स्वीकारला. त्यांनी घरच्यांना ओळखलं आणि मला अभिनय सोडायला सुचवलं”. मुमताज पुढे म्हणते, “आमच्या कुटुंबातील कोणीही हिंदू आणि मुस्लिमांकडे लक्ष दिले नाही. आम्ही कधीही धर्मात भेदभाव केला नाही. माझ्या बहिणीनेही हिंदू विवाह केला आहे”. गुजराती हिंदू व्यावसायिकासोबतच्या तिच्या लग्नाबद्दल मुमताज म्हणते, “माझं त्याच्यासोबतचं लग्न ठरलं होतं आणि मी माझ्या कुटुंबाच्या सल्ल्याचे पालन केले. मी पुराणमतवादी कुटुंबातून आले आहे – इराणी असेच आहेत”.
यासोबतच लग्नानंतरच्या आयुष्याविषयी बोलताना मुमताज म्हणाली, “लग्नानंतर मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात कधीही बदल करण्याची गरज पडली नाही. माधवानी घराण्याच्या संपत्तीबद्दल मला फुशारकी मारायची नाही, पण तिथे बरेच स्वयंपाकी होते. तेथे शाकाहारी आणि मांसाहारींसाठी स्वतंत्र भोजन तयार करण्यात आले. माझ्यावर कधीच मांसाहार सोडण्याचा दबाव नव्हता. माझे पती शाकाहारी आहेत. पण त्याने मला कधीच माझा आहार बदलण्यास सांगितले नाही”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…
इतकंच नाही तर मुमताजने फिरोज खानसोबतच्या तिच्या नात्याबद्दलही सांगितलं आणि जुने दिवस आठवत म्हणाली, “मी फिरोजला लग्नाआधी ओळखत होते. त्यावेळी त्याची इंग्लंडमध्ये एक मैत्रीण होती. आम्ही खूप चांगले मित्र होतो आणि एकत्र कामही केले. अशा परिस्थितीत, अशी कोणतीही स्त्री नसेल जी त्याच्या प्रेमात पडणार नाही. तो खूप हँडसम होता”. अभिनेत्रीचा असा विश्वास आहे की ते दोघेही मूळचे इराणी होते, त्यामुळेच ते एकमेकांशी जोडले गेले. मात्र, त्यांच्यात प्रेमसंबंध नसल्याची कबुलीही त्यांनी या संवादात दिली. मुमताजची मुलगी नताशा माधवानी हिचे लग्न फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खानसोबत झाले आहे. दोघांनी २००५ साली लग्न केले. फिरोजच्या कुटुंबाबद्दल मुमताज सांगतात की, ते खूप प्रेमळ कुटुंब आहे आणि फिरोजची मुले खूप चांगली आहेत.




