Rajesh Sharma Infection : बॉलिवूड आणि बंगाली चित्रपटांचे सुप्रसिद्ध अभिनेते राजेश शर्मा हे सध्या रुग्णालयात दाखल आहेत. रिपोर्ट्सनुसार, प्रभासच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना काही कीटक किंवा विषारी कोळी चावला होता. सुरुवातीला किरकोळ समस्या समजून त्यांनी शूटिंग पूर्ण केले, परंतु काही तासांनंतर, त्यांच्या पायात तीव्र वेदना सुरू झाल्या आणि त्यांची प्रकृती झपाट्याने ढासळू लागली. कोलकत्याला परत येईपर्यंत त्यांना खूप ताप आला, त्यानंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. कीटक चावल्यामुळे होणारा संसर्ग किती धोकादायक असू शकतो याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
कीटक चावणे किती धोकादायक आहे?
डास, मुंगी, मधमाशी किंवा इतर लहान कीटक चावल्यामुळे किंचित खाज येणे, लालसर होणे किंवा सूज येणे हे सामान्य मानले जाते, परंतु काही प्रकरणांमध्ये या लहान जखमेमुळे गंभीर संसर्ग होऊ शकतो. चावणारा कीटक जर विषारी असेल किंवा त्यातून जीवाणू शरीरात पोहोचले तर परिस्थिती झपाट्याने बिघडू शकते.
आरोग्याविषयी माहिती देणारी वेबसाईट हेल्थलाइनच्या तज्ज्ञांच्या मते, कीटक चावल्याच्या ठिकाणी लालसरपणा वाढू लागला, सूज पसरू लागली, तीव्र वेदना होत असतील, पू बाहेर पडू लागला किंवा ताप येऊ लागला तर त्याला हलके घेऊ नये. ही सर्व चिन्हे असे दर्शवतात की संसर्ग शरीरात पसरत आहे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास ते त्वचेच्या खोल थरांपर्यंत पोहोचू शकते.
आणखी वाचा – “बापाला मरताना नाही पाहायचंय”, ‘सैराट’ फेम अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, वडिलांची प्रकृती गंभीर आणि…
समस्या कधी गंभीर होऊ शकते?
काही प्रकरणांमध्ये, हा संसर्ग सेल्युलाईटिससारख्या गंभीर आजाराचे रूप घेऊ शकतो. यामध्ये बॅक्टेरिया त्वचेत आणि त्याखालील ऊतींमध्ये वेगाने पसरू लागतात. यावर वेळीच उपचार न केल्यास संसर्ग रक्तापर्यंत पोहोचतो आणि जीवघेणी स्थितीही निर्माण होऊ शकते. त्यामुळे कीटक चावल्यानंतर होणाऱ्या असामान्य बदलांकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला डॉक्टर सतत देतात. चाव्याच्या ठिकाणाहून शरीराच्या इतर भागांकडे लाल रेषा दिसल्यास, लिम्फ नोड्स सुजल्या किंवा तीव्र थंडी वाजून ताप येऊ लागला, तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. काही लोकांमध्ये, कीटकांच्या विषामुळे किंवा ऍलर्जीमुळे, श्वास घेण्यास त्रास होणे, चेहरा किंवा घसा सुजणे आणि बेशुद्ध होणे यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. अशी परिस्थिती वैद्यकीय आणीबाणी मानली जाते.
हे आहेत प्रतिबंधाचे उपाय?
संसर्ग टाळण्यासाठी, सर्वप्रथम चावलेला भाग साबणाने आणि स्वच्छ पाण्याने पूर्णपणे धुवावा. खाज येत असल्यास, वारंवार खाजवणे टाळा, कारण यामुळे जखमेच्या आत बॅक्टेरिया पोहोचू शकतात. गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटिबायोटिक क्रीम किंवा इतर औषधे वापरली जाऊ शकतात. दुखणे, सूज किंवा ताप वाढत राहिल्यास, विलंब न करता रुग्णालयात पोहोचणे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे.





