‘कभी खुशी कभी गम’, ‘बागबान’, ‘चलते चलते’, ‘बाबुल’सारख्या जवळपास शंभर चित्रपटांना संगीत देणारे सुप्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांनी काही वर्षांपूर्वीच या जगाचा निरोप घेतला. कर्करोगानं आजारी असलेल्या श्रीवास्तव २०१५ साली कर्करोगामुळे निधन झाले. आदेश यांना कर्करोग झाल्याचे निदान प्रथम २०१० साली झाले. त्यानंतर ते सिनेसृष्टीत फारसे सक्रीय नव्हते. दरम्यानच्या काळात वेगवेगळे उपचार घेऊन मोठ्या जिद्दीनं त्यांनी कॅन्सरवर मात केली. मात्र, मृत्यूने त्यांना अखेर हेरलंच आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पत्नी व अभिनेत्री विजयता पंडीत या एकट्या पडल्या. पतीच्या निधनानंतर त्यांना फार कठीण परिस्थितीतून जावे लागले. याच कठीण काळाबद्दल त्यांनी नुकतेच भाष्य केले.
विजयता पंडीत यांनी सांगितले की, पती संगीतकार आदेश श्रीवास्तव यांच्या निधनानंतर त्या एकट्या पडल्या आणि या काळात इंडस्ट्रीतील कोणीही त्यांच्या तब्येतीची चौकशी केली नाही. ‘लहरेन रेट्रो’शी बोलताना विजेता पंडित असं म्हणाल्या की, “आदेशजी गेल्यानंतर कोणीही माझ्या घरी आले नाही आणि मी कशी आहे हे विचारले नाही. आम्ही कुटुंब आहोत असे इंडस्ट्रीत बोलले जाते पण कुटुंब समजून मला कुणीही विचारायला आलं नाही. जोपर्यंत तुमचे काम आहे तोपर्यंत तुम्ही चांगले आहात हे मी अनुभवले आहे. मी सगळ्या गायकांची नावे घेणार नाही, पण सगळे आमच्या इथे यायचे, खाणे-पिणे करायचे, वाढदिवसाच्या पार्टी करायचे. आदेशजी गेल्यानंतर मी कोणाची हाकही ऐकलेली नाही”.
आणखी वाचा – बॉलिवूड अभिनेत्याचा मुंबईमध्ये झाला होता मोठा अपघात, आयसीयूमध्ये दाखल केल्यानंतर अशी झाली आहे अवस्था
याशिवाय, विजयता पंडीत यांनी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानबद्दलही भाष्य केलं. याबद्दल विजयता पंडीत म्हणाल्या की, “शाहरुखने मला त्याचा नंबर दिला होता, पण आता तो बंद आहे. मी शाहरुखला आठवण करून देऊ इच्छिते की आदेश आणि तो चांगले मित्र होते. शाहरुख माझ्या मुलाला मदत कर. त्यांना तुमच्या पाठिंब्याची गरज आहे”. अमिताभ यांच्याबद्दल विजयता पंडीत म्हणाल्या की, “आदेशने अमिताभ यांच्याबरोबर खूप जवळून काम केले आहे. अवितेशच्या कार्यक्रमाला अमिताभ यायचे. अवितेशच्या पहिल्या गाण्याच्या लाँचिंगलाही ते आले होते. पण आता ते यायचे थांबले आहेत. अमितजींनी माझ्या मुलासाठी काहीतरी करावे अशी वेळ आली आहे”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 च्या घरामधून निक्की पडली बाहेर?, अरबाजला मिठी मारत ढसाढसा रडू लागली अन्…; प्रोमो व्हायरल
दरम्यान,विजयता पंडीत सध्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आल्या आहेत. आदेश श्रीवास्तव यांच्या निधननानंतर सुरू झालेल्या स्ट्रगल , बॉलिवूडमधील कलाकरांनी दिलेला आधार… अशा अनेक गोष्टींवर त्या बोलल्या आहेत. पण अनेक कलाकारांना त्यांनीच दिलेल्या शब्दाचा विसर पडल्याचीही खंत त्यांनी या मुलाखतीत बोलून दाखवली आहे.