तनुश्री दत्ता व नाना पाटेकर यांच्यातील लैंगिक शोषणाचे प्रकरण खूप चर्चेत आहे. या प्रकरणावरुन तनुश्रीने अभिनेत्यावर गंभीर आरोपही केले होते. आता एका मुलाखतीदरम्यान नाना पाटेकर यांनी हे आरोप खोटे ठरवत भाष्य केलं आहे. नानांनी आरोप खोटे असल्याचं केलेल्या भाष्यावर तनुश्रीला राग आला आहे. यावर तनुश्रीने भाष्य करत नाना पाटेकर घाबरले आहेत कारण त्यांचे समर्थक कमी झाले आहेत. तनुश्रीने नाना पाटेकर यांना खोटारडा असे म्हटलं आहे. तनुश्री व नाना पाटेकर यांचा सहा वर्ष जुना Me Too मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (tanushree dutta on nana patekar)
नाना पाटेकर यांच्या नुकत्याच झालेल्या वक्तव्यानंतर तनुश्रीने ‘टाईम्स नाऊ’ला सांगितले की, “नानांना पाठिंबा देणारे कमी होत आहे त्यामुळे ते घाबरले आहेत”. ती म्हणाली, “आता तो घाबरला आहे आणि त्याचा बॉलिवूडमधील सपोर्टही कमी झाला आहे. त्याला साथ देणारे सर्व लोक एकतर कमी झाले आहेत किंवा त्याच्यापासून दुरावले आहेत. त्यामुळे तो पुन्हा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. आता सहा वर्षे जुन्या आरोपांवर बोलत आहेत. नाना पाटेकर यांना खोटं बोलण्याचा आजार आहे”.
‘लल्लनटॉप’च्या संभाषणात नाना पाटेकर यांना विचारण्यात आले की, ते तनुश्रीच्या MeToo आरोपांवर ते नाराज आहेत का?, यावर नानांनी हे आरोप खोटे असल्याचे उत्तर दिले आहे. त्यामुळे त्यांना राग आला नाही. यावेळी बोलताना ते म्हणाले, “मला या गोष्टीचा राग आला नाही कारण हे सर्व आरोपच खोटे आहेत. मला या आरोपांमुळे काहीच फरक पडला नाही. कारण काही घडलंच नव्हतं. काही झालं असतं तर सांगितलं असतं. अचानक कोणीतरी म्हणतं की तुम्ही हे केलं, तुम्ही ते केलं. मी तसं काहीच केलेलं नाही याशिवाय मी वेगळं काय बोलू शकतो”, असं ते म्हणाले.
तनुश्री दत्ताने २००८ मध्ये नाना पाटेकर यांच्याबरोबर काम केले होते. २०१८-१९ या वर्षात ‘हॉर्न ओके प्लीज’च्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी आपले शोषण केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. तनुश्रीने असेही म्हटले होते की, छेडछाडीचा निषेध केल्याने तिला तिच्या करिअरमध्ये नुकसान झाले.