Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीच काही ना काही नवनवीन घडताना दिसतं. बरेचदा स्पर्धकांमधील वाद, चर्चा, भांडण तसेच ‘बिग बॉस’ कडून देण्यात येणारे अनपेक्षित टास्क हे सारं पाहणं रंजक ठरतं. ‘बिग बॉस मराठी’च्या या नव्या पर्वाची सुरुवातच धमाकेदार झाली. सध्या या पर्वाचा नववा आठवडा सुरु झाला असल्याचे पाहायला मिळते. नुकत्याच आठव्या आठवड्याच्या एलिमिनेशनमध्ये दोन स्पर्धक घराबाहेर गेले. शारीरिक दुखापतीमुळे संग्राम चौगुले या वाइल्ड कार्ड स्पर्धकाला ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास थांबवावा लागला. तर एलिमिनेशन मध्ये कमी मत पडल्याने अरबाज पटेलचा प्रवास संपला.
त्यानंतर ‘बिग बॉस’च्या घरात सगळेच बदलले. सर्वच सदस्य ट्रॉफी जिंकण्यासाठी चढाओढ करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’ यांनी सर्व सदस्यांना असं सांगितलं की, निर्णय न घेऊ शकणारे असे दोन सदस्य तुमच्या मते कोण आहेत हे सांगायचे आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये ही स्पर्धक मंडळी आपापल्या मते दोन निर्णय न घेणारे स्पर्धक कोण आहेत हे सांगताना दिसत आहेत. समोर आलेल्या प्रोमोमध्ये वर्षाताई यांनी पदी कांबळेचे नाव घेतलं. तर अभिजीतने जान्हवी किल्लेेकरच नाव घेतलेल पाहायला मिळालं. तर वर्षा ताईंनी दुसरं नाव हे धनंजय पोवारच घेतलेला पाहायला मिळालं.
त्यानंतर अंकिता वालावलकरने घेतलेल्या नावाने साऱ्यांना धक्का बसला. सलग दुसऱ्यांदा अंकिताने सूरजचं नाव घेतलं असल्याचा पाहायला मिळालं. यापूर्वीही अंकिताने नॉमिनेशन टास्कमध्ये सूरजच नाव घेतलं होतं. नेहमीच भाऊ भाऊ म्हणणाऱ्या सूरजबरोबर अंकिता अशी का वागली असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. प्रोमो मध्ये असं पाहायला मिळत आहे की, अंकिता म्हणते ‘बिग बॉस’ माझं दुसरं नाव सूरज आहे. त्यावेळी सूरज व निक्की एकत्र उभे असतात. तेव्हा निक्की सूरजला टोमणा देत म्हणते की, “ही असलीयत आहे. भाऊ भाऊ बोलून गळा पकडायचा”. आता अंकिताने केलेलं योग्य आहे की अयोग्य हे येणाऱ्या भागातच कळेल.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “जाताना तो किडे करुन गेला”, अंकिताचे अरबाजबद्दल भाष्य, कोकण हार्टेड गर्ल असं का म्हणाली?
दरम्यान, या प्रोमोवर अनेकांनी कमेंट करत अंकिताला ट्रोल केलेलं पाहायला मिळत आहे. सूरज चव्हाणचा संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठा चाहतावर्ग आहे. कायम बरोबर असणाऱ्या अंकिताने घेतलेला हा निर्णय चूक आहे असं सूरजच्या चाहत्यांचा म्हणणं आहे. त्यांनी सूरजला पाठिंबा देत अंकिताला खडेबोल लगावले आहेत.