अनेक कलाकार हे त्यांच्या अभिनया व्यतिरिक ओळखले जातात ते प्रेक्षकांप्रती त्यांच्या मनात असलेल्या आदरयुक्त भावनेसाठी. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी शक्य ते सर्वकाही करणाऱ्या कलाकारांच्या यादीत एक नाव हमखास घ्यावं ते म्हणजे अभिनेते अशोक सराफ. त्याचं कारणही असच आहे. नाटकाच्या एका प्रयोगासाठी मुंबईच्या तुफान पाउसामध्ये अशोक सराफ महालक्ष्मी ते दादर स्टेशन रेल्वे रुळावरून चालत गेले होते. वाचा नक्की काय आहे तो किस्सा आजच्या जपलं ते आपलं या भागात.(ashok saraf struggle)
चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच अशोक सराफ हे अनेक मराठी नाटकांसाठी देखील प्रसिद्ध होते. अशोक सराफ यांच्या नाटकांपैकी ‘हिमालयाची सावली’ या नाटकाचा प्रयोग दादर येथी शिवाजी मंदिरात होता. अशोक सराफ त्याकाळी फोर्ट येथील स्टेट बँकेत कामाला होते. कामावरून थेट प्रयोगाला जाण्याचं अशोक सराफ यांनी ठरवलं. तुफान पाऊस असल्यामुळे अशोक सराफ यांनी बसमुळे ट्रॅफिकमध्ये अडकायला नको म्हणून ट्रेन ने जाणं सोयीचं समजलं आणि ते बॉम्बे सेंट्रल स्टेशनला पोहचले.(ashok saraf marathi drama)
स्टेशनवरच्या गर्दीत ही अशोक सराफ यांनी ट्रेन पकडली पण चार स्टेशन पार करण्यासाठी गाडी ने सव्वा तास लावला. प्रयोगाची वेळ जस जशी जवळ येत होती अशोक सराफ यांची घालमेल ही वाढत होती. शेवटी अशोक सराफ यांनी मधेच थांबलेल्या ट्रेन मधून उतरत सरळ रेल्वे रुळावरून दादरच्या दिशेने प्रवास सुरु केला. गडद काळोखात अशोक सराफ यांनी मागून अचानक गाडी येईल याचा ही विचार न करता, चिखल तुडवत धावत दादरच्या दिशेने प्रवास सुरु केला.
महालक्ष्मी ते दादर धावत, रेल्वे रुळावरून केलेला प्रवास पार करून अशोक मामा अखेर शिवाजी मंदिरला पोहचले. त्यांना पोहचेपर्यँत बराच वेळ झाला. मोबाइल नसल्या कारणाने तेव्हा कोणाला कळवता ही आलं नाही. पण प्रेक्षकही तेव्हा नाटकासाठी वाट बघत थांबले होते. धावपळीत झालेला हा प्रयोग देखील चांगलाच रंगला होता.(ashok saraf acting)