शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्या चुकांमुळे…”, पहिल्या लग्नाचा आमिर खानला पच्छाताप, रीना दत्ताबाबत म्हणाला, “आमचे लग्न झाल्यावर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 2, 2025 | 12:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
aamir khan on his first marriage

"त्या चुकांमुळे…", पहिल्या लग्नाचा आमिर खानला पच्छाताप, रीना दत्ताबाबत म्हणाला, "आमचे लग्न झाल्यावर…"

aamir khan on his first marriage : आमिर खान त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरेचदा चर्चेत राहिलेला पाहायला मिळाला आहे. पहिल्या दोन घटस्फोटामुळे तो बराच चर्चेत राहिला आहे. पण आता तो त्याच्या नव्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. आता आमिर गौरी सप्रेटबरोबरच्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. याशिवाय आमिर सध्या ‘सितारे जमीन पर’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच, त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील चुकांबाबत एका पॉडकास्टमध्ये केलेलं भाष्य लक्षवेधी ठरत आहे. यावेळी त्याने त्याच्या पहिली पत्नी रीना दत्ताबद्दलही भाष्य केले आणि सांगितले की दोघांनीही घाईत लग्न केले. आणि त्याला याचा नेहमीच पश्चाताप होतो.

राज शामणीच्या पॉडकास्टमध्ये आमिर खानने चित्रपटांव्यतिरिक्त, प्रेम, कौटुंबिक आणि जीवनातील आपल्या निर्णयांवर आणि चुकांबाबत भाष्य केले. जेव्हा आमिरला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चुकांबद्दल विचारले गेले तेव्हा अभिनेत्याने सांगितले की, त्याने बर्‍याच चुका केल्या आहेत. आमिर म्हणाला की, आज जे काही आहे ते त्याच्या चुकांमुळे आहे. आमिरने रीना दत्ता यांच्याशी लग्न करण्यास घाई केली याचा पच्छाताप होत असल्याचाही खुलासा केला. आमिरने रीना दत्ता यांच्याशी लग्न केले आणि घाईघाईने लग्न केल्याचे म्हणत खेद व्यक्त केला. त्यावेळी रीना १९ वर्षांची होती आणि आमिर २१ वर्षांचा होता.

आणखी वाचा – सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सुरु केला स्वत:चा नवीन व्यवसाय, आईसाठी अभिनेत्याची खास पोस्ट, म्हणाला, “हे नवं दुकान…”

तो म्हणाला, “मी आयुष्यात बर्‍याच चुका केल्या. मला वाटते की आज मी काय आहे ते केवळ माझ्या यशामुळेच नाही तर माझ्या चुकांमुळे आहे. आता मी एक साधी गोष्ट बोलतो. रीना आणि मी खूप लवकर लग्न केले. मी २१ वर्षांचा होतो आणि ती १९ वर्षांची होती. कायदेशीररित्या मी लग्न करण्याचा पहिला दिवस हा १४ मार्च होता कारण त्यादिवशी मी २१ वर्षांचा झालो. पण मी त्यानंतर एका महिन्याची नोटीस घेतली आणि एक महिन्या नंतरचा एक दिवस घेत रीनाशी लग्न केले. आम्ही फक्त चार महिने एकमेकांना ओळखत होतो”.

View this post on Instagram

A post shared by Aamir Khan Productions (@aamirkhanproductions)

आमिर पुढे म्हणाला, “आणि १८ एप्रिल रोजी लग्न केले. त्यापूर्वी आम्ही फक्त चार महिने एकमेकांना ओळखत होतो. त्यामध्येही आम्ही एकमेकांशी फारच कमी वेळ घालवला. आमचे एकमेकांवर खूप प्रेम होते. म्हणून आमचे लग्नही झाले. मला इतक्या लवकर लग्न करण्याची गरज नव्हती, पण रीना चूक नव्हती”. आमिर पुढे म्हणाला, “पण आज जेव्हा मी पाहतो तेव्हा इतक्या लवकर कोणी लग्न करत नाही. लग्न करण्याच्या निर्णयात सावधगिरीने पाऊल उचलले पाहिजे. त्यावेळी, आपल्याला तारुण्याच्या उत्साहात बर्‍याच गोष्टी समजत नाहीत. रीनाबरोबर माझे आयुष्य खूप चांगले आहे. म्हणून मी याचा अर्थ असा काढत नाही की रीना एक चूक होती. मी याचा अर्थ असा घेत नाही”.

आणखी वाचा – प्रिन्स नरुला व युविका चौधरीच्या घरी चोरी, मौल्यवान वस्तू लंपास, घरकाम करणाऱ्या महिलेचाच डाव

आमिर पुढे म्हणाला, “त्याऐवजी रीना एक अद्भुत व्यक्ती आहे. आम्ही एकत्र वाढलो. आमचे लग्न झाल्यावर आम्ही खूप लहान होतो. रीना आणि मी एकमेकांचा खूप आदर करतो. एकमेकांबद्दल आपल्या हृदयात खूप प्रेम आहे. परंतु इतक्या लहान वयात अशा घाईत कोणीही इतके मोठे पाऊल उचलू नये. परंतु जर मी ते केले नसते तर मी आज तुमच्यासमोर बसलो नसतो”. रीना आणि त्यांच्या घटस्फोटाबाबत आमिर म्हणाला, “मी चित्रपटांमध्ये खूप हरवून जायचो. आणि ही वस्तुस्थिती आहे. मी खूप काम करतो. मी खूप भावनिक होतो, पण मी आता स्वतःला सुधारले आहे. पूर्वी, जर एखाद्याने मला दुखवले तर मला खूप वाईट वाटायचे. मी ३-४ दिवस कोणाशीही बोलायचो नाही.

Tags: aamir khanbollywood newsentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Vikram Sugumaran death

सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचं ४०शीमध्येच धक्कादायक निधन, बसने प्रवास करतानाच मृत्यूने कवटाळलं अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.