aamir khan on his first marriage : आमिर खान त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरेचदा चर्चेत राहिलेला पाहायला मिळाला आहे. पहिल्या दोन घटस्फोटामुळे तो बराच चर्चेत राहिला आहे. पण आता तो त्याच्या नव्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. आता आमिर गौरी सप्रेटबरोबरच्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. याशिवाय आमिर सध्या ‘सितारे जमीन पर’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच, त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील चुकांबाबत एका पॉडकास्टमध्ये केलेलं भाष्य लक्षवेधी ठरत आहे. यावेळी त्याने त्याच्या पहिली पत्नी रीना दत्ताबद्दलही भाष्य केले आणि सांगितले की दोघांनीही घाईत लग्न केले. आणि त्याला याचा नेहमीच पश्चाताप होतो.
राज शामणीच्या पॉडकास्टमध्ये आमिर खानने चित्रपटांव्यतिरिक्त, प्रेम, कौटुंबिक आणि जीवनातील आपल्या निर्णयांवर आणि चुकांबाबत भाष्य केले. जेव्हा आमिरला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चुकांबद्दल विचारले गेले तेव्हा अभिनेत्याने सांगितले की, त्याने बर्याच चुका केल्या आहेत. आमिर म्हणाला की, आज जे काही आहे ते त्याच्या चुकांमुळे आहे. आमिरने रीना दत्ता यांच्याशी लग्न करण्यास घाई केली याचा पच्छाताप होत असल्याचाही खुलासा केला. आमिरने रीना दत्ता यांच्याशी लग्न केले आणि घाईघाईने लग्न केल्याचे म्हणत खेद व्यक्त केला. त्यावेळी रीना १९ वर्षांची होती आणि आमिर २१ वर्षांचा होता.
तो म्हणाला, “मी आयुष्यात बर्याच चुका केल्या. मला वाटते की आज मी काय आहे ते केवळ माझ्या यशामुळेच नाही तर माझ्या चुकांमुळे आहे. आता मी एक साधी गोष्ट बोलतो. रीना आणि मी खूप लवकर लग्न केले. मी २१ वर्षांचा होतो आणि ती १९ वर्षांची होती. कायदेशीररित्या मी लग्न करण्याचा पहिला दिवस हा १४ मार्च होता कारण त्यादिवशी मी २१ वर्षांचा झालो. पण मी त्यानंतर एका महिन्याची नोटीस घेतली आणि एक महिन्या नंतरचा एक दिवस घेत रीनाशी लग्न केले. आम्ही फक्त चार महिने एकमेकांना ओळखत होतो”.
आमिर पुढे म्हणाला, “आणि १८ एप्रिल रोजी लग्न केले. त्यापूर्वी आम्ही फक्त चार महिने एकमेकांना ओळखत होतो. त्यामध्येही आम्ही एकमेकांशी फारच कमी वेळ घालवला. आमचे एकमेकांवर खूप प्रेम होते. म्हणून आमचे लग्नही झाले. मला इतक्या लवकर लग्न करण्याची गरज नव्हती, पण रीना चूक नव्हती”. आमिर पुढे म्हणाला, “पण आज जेव्हा मी पाहतो तेव्हा इतक्या लवकर कोणी लग्न करत नाही. लग्न करण्याच्या निर्णयात सावधगिरीने पाऊल उचलले पाहिजे. त्यावेळी, आपल्याला तारुण्याच्या उत्साहात बर्याच गोष्टी समजत नाहीत. रीनाबरोबर माझे आयुष्य खूप चांगले आहे. म्हणून मी याचा अर्थ असा काढत नाही की रीना एक चूक होती. मी याचा अर्थ असा घेत नाही”.
आणखी वाचा – प्रिन्स नरुला व युविका चौधरीच्या घरी चोरी, मौल्यवान वस्तू लंपास, घरकाम करणाऱ्या महिलेचाच डाव
आमिर पुढे म्हणाला, “त्याऐवजी रीना एक अद्भुत व्यक्ती आहे. आम्ही एकत्र वाढलो. आमचे लग्न झाल्यावर आम्ही खूप लहान होतो. रीना आणि मी एकमेकांचा खूप आदर करतो. एकमेकांबद्दल आपल्या हृदयात खूप प्रेम आहे. परंतु इतक्या लहान वयात अशा घाईत कोणीही इतके मोठे पाऊल उचलू नये. परंतु जर मी ते केले नसते तर मी आज तुमच्यासमोर बसलो नसतो”. रीना आणि त्यांच्या घटस्फोटाबाबत आमिर म्हणाला, “मी चित्रपटांमध्ये खूप हरवून जायचो. आणि ही वस्तुस्थिती आहे. मी खूप काम करतो. मी खूप भावनिक होतो, पण मी आता स्वतःला सुधारले आहे. पूर्वी, जर एखाद्याने मला दुखवले तर मला खूप वाईट वाटायचे. मी ३-४ दिवस कोणाशीही बोलायचो नाही.