मराठी चित्रपटाला शो न मिळणं या ही शोकांतिका आजची न्हवे. अनेक चांगले चित्रपट, कथा, गुणी कलाकार यांच्या कष्टाचं फळ त्यांना न मिळणं हा त्यांच्यावर अन्याय आहेच. या संदर्भात बबन, ख्वाडाच्या यशा नंतर आता TDM सारख्या चांगल्या कथेला प्रेक्षकांची मागणी असून शो न मिळणं याबद्दल कलाकारांनी आणि दिगदर्शकानी खंत व्यक्त केली आहे.(TDM Marathi Movie Controversy)
TDM चित्रपटाचे दिगदर्शक भाऊराव कऱ्हाडे यावेळी स्पष्ट शब्दात म्हणाले की, ‘आज ‘टीडीएम’ चित्रपट लोकांना आवडतोय आणि लोक हा चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त ही करतायत मात्र चित्रपटगृहात शो नसल्याकारणास्तव मराठी प्रेक्षकांवर आणि आम्हा सर्व कलाकारांवर हा अन्याय होतोय. मला कुठेतरी वाटतंय की हे सर्व चित्र पाहून मराठी सिनेमा संपतोय, किंवा संपवला जातोय. आता यापुढे सिनेमा करण्याची माझी वैयक्तिक इच्छा नाही. आम्ही असं म्हणत नाही आमचा सिनेमा चांगला आहे, पण सिनेमाला प्रेक्षक प्रतिसाद देत असताना शो रद्द करणं हे कितपत योग्य आहे.
परवा पासून पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात एक शो होता, काल दोन शो होते चित्रपट गृह तुडुंब भरलेले असताना ही वाढवून शो दिलाच नाही. लोकांना चित्रपट पाहायचाय त्यांची मागणी आहे, म्हणून मी स्वतः थेटर मालकांजवळ विचारपूस केली तर त्याच असं म्हणणं आहे की एकच शो लावा असा वरून प्रेशर आहे. माझ्या चित्रपटाला जे शो मिळाले आहेत ते पण प्राईम टाईम मधील नसून ऑड टाईममधील आहेत, आणि ऑड टाईम असल्यामुळे प्रेक्षकांना त्या वेळेत तिथवर पोहोचणं शक्य नाही आहे आणि हे सर्व पाहून आम्हाला खूप त्रास होतोय. माझा चित्रपट नसेल आवडला तर स्पष्ट मला लोकांनी सांगावं की, तुझा सिनेमा चांगला नाही, तू लायक नाहीस त्या दिवशी मी सिनेमा निर्मितीच काम बंद करेन’. असं म्हणून भाऊराव कऱ्हाडे यांना अश्रू अनावर झाले.(TDM Marathi Movie Controversy)
प्रेक्षक , कलाकार, दिगदर्शक, चांगला कन्टेन्ट यांच्या मध्ये चालणारी थिएटर मालकांची मक्तेदारी यावर योग्य वेळी आळा बसला तर चांगल्या कथेपासून प्रेक्षकवर्ग वंचित राहणार नाही,