शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नात चेहराच जळाला, ढसाढसा रडली अन्…; पारूने सांगितली तिच्या लग्नातील सत्य घटना, वाईट वेळ आली पण…

काजल डांगेby काजल डांगे
फेब्रुवारी 16, 2025 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sharayu Sonawane Wedding Scene

लग्नात चेहराच जळाला, ढसाढसा रडली अन्…; पारूने सांगितली तिच्या लग्नातील सत्य घटना, वाईट वेळ आली पण…

Sharayu Sonawane Wedding Scene : पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांचे नेहमीच चांगल्या अर्थाने दोन चेहरे असतात असं म्हटलं जातं. याचं मुख्य कारण म्हणजे कॅमेऱ्यासमोर असताना त्यांना त्यांचं खासगी आयुष्य विसरुन प्रत्येक भूमिकेसाठी जीव ओतून काम करावं लागतं. झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेतील शरयूही अगदी असंच कौतुकास्पद काम करते. तिच्या कामामुळेच ती आज घराघरांत पोहोचली आहे. शरयूने खासगी आयुष्यातही अनेक प्रसंगांना हिंमतीने तोंड दिलं. इतकंच काय तर तिच्या लग्नातच एक भयंकर घटना घडली. शरयूचा चेहराच पूर्ण जळाला होता. ही घटना नेमकी काय होती याचबाबत तिने व तिचा पती जयंत लाडेने मुलाखतीत सांगितलं आहे.

‘पारू’ फेम शरयू व तिचा पती जयंत लाडेने व्हॅलेंटाइन डेनिमित्त ‘इट्समज्जा’ बरोबर संवाद साधला. यावेळी दोघांनीही त्यांची लव्हस्टोरी सांगितली. तसेच लग्नातील धमाल किस्सेही दिलखुलासपणे सगळ्यांसमोर उघड केले. यावेळी शरयूला लग्नादरम्यान एका विचित्र घटनेचा सामना करावा लागला. याचबाबत पती जयंत यांनी सांगितलं. ते म्हणाले, “शूटमधून तिला सुट्टी मिळाली आणि परवा लग्न असं सगळं होतं. सगळं प्लॅनिंग करायला हिच्याकडे फक्त एक दिवसच होता. रात्री शूट संपवून उशीरा घरी आली. त्यामुळे शरयू दुसऱ्या दिवशी दिवसा सलॉनमध्ये गेली. तिथे तिने चेहऱ्याचं वॅक्स केलं. वॅक्स करताना त्यांनी काहीतरी चुकीचं केमिकल वापरलं. त्यामुळे शरयूचा संपूर्ण चेहराच जळला होता. चेहऱ्यावर डाग झाले”. याच प्रसंगाबाबत शरयू म्हणाली, “लग्न, सगळ्या विधी मस्त एन्जॉय करायच्या हे माझं ठरलं होतं. आणि तसंच मला करायचं होतं. मला खूप छान दिसायचं आहे हिच माझी इच्छा होती”.

आणखी वाचा – मढमध्ये रस्त्यांची दुरावस्था, तरीही तिथेच बारावी परीक्षेचं सेंटर अन्…; शशांक केतकरने दाखवली सत्य परिस्थिती, याला जबाबदार कोण?

जयंत पुढे म्हणाले, “दुसऱ्यादिवशी लगेच मुळशीसाठी आम्हाला निघायचं होतं. तिथेच एका रिसॉर्टमध्ये आमचं लग्न झालं. ज्या दिवशी सलॉनमधून ही घरी आली त्यादिवशी मेहंदी होती. दुसऱ्या दिवशी लग्नासाठी जाणार तर हिची रडारड सुरु झाली. फोटो बघितल्यानंतर मलाही धक्का बसला”. यादरम्यान दोन्ही कुटुंबियांनाही रडू आवरत नव्हतं. “माझ्या घरी मी रडले की, माझी आई, मावशी, ताई असे सगळे रडायचे. मला बघून सगळे रडत होते. माझ्या सासूबाईंनाही कळत होतं की शरयू रडतेय. मी रडत आहे हे पाहून जयंतच्या घरातीलही सगळे रडायचे”. पण या कठीण प्रसंगात शरयूच्या नवऱ्याने एक निर्णय घेतला. याचबाबत जयंत म्हणाला, “काही विघ्न आलं का? असं घरातील मंडळींनाही वाटू लागलं. मग मी निर्णय घेतला की, जे असेल ते आपण करु. माझ्या ओळखीतील चांगल्या मेकअप आर्टिस्टला मी बोलावलं. तिच्या चेहऱ्यावर जेवढे डाग झाले होते ते मेकअप आर्टिस्टने सगळं नीट केलं. मेकअप नंतरही तिच्या चेहऱ्यावरचे डाग दिसतच होते. शरयूला तोंडही उघडता येत नव्हतं. पण शरयूला एक हिंमत दिली. सगळं चांगलं होणार म्हणून समजवलं. लग्नासाठी पोहोचलो तिथे आमच्या दोन्ही कुटुंबाचं जल्लोषात स्वागत झालं”.

आणखी वाचा – ‘छावा’साठी प्रेक्षक वेडे, एका दिवसातच कमावले तब्बल इतके कोटी, विकी कौशलचा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करणार

जयंत पुढे म्हणाला, “साखरपुड्यासाठी शरयू उभी राहिली आणि जोरजोरात रडायला लागली. मी पहिल्यांदाच लग्न करतेय असं कसं करणार. चेहरा खराब होता. आपण लग्न पुढे ढकलू असं सगळं तिचं सुरु होतं. तेव्हाही तिला कसंतरी समजावलं. काही लोक लग्नाला आले होते त्यांनाही हिचा चेहरा बघून धक्का बसला होता. कारण डाग तेवढे दिसत नसले तरी मेकअप एवढा का केला? हा त्यांना प्रश्न होता. आम्ही हे सगळं कोणालाच कळू दिलं नाही. आजपर्यंत कोणालाच हे सगळं माहित नाही. फक्त या मुलाखतीत आज आम्ही पहिल्यांदा सांगितलं आहे”. शरयू व जयंत यांच्यामधील नातं पहिल्यांदाच खुलेपणाने प्रेक्षकांसमोर आलं आणि दोघांमधील नात्याचा गोडवाही सगळ्यांना अनुभवायला मिळाला.

Tags: paaruSharayu Sonawane WeddingSharayu Sonawane Wedding Scene
काजल डांगे

काजल डांगे

काजल डांगे या 'इट्स मज्जा' वेबसाईटच्या सीनिअर एडिटर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. महर्षी दयानंद महाविद्यालयामधून त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (बीएमएम) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना साम टीव्ही, प्रहार वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. त्यानंतर त्यांनी ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीपासून पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त वाहिनीमध्ये दोन वर्षांचा अनुभव. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्रामध्ये दोन वर्ष सब एडिटर म्हणून जबाबदारी हाताळली. शिवाय ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या प्रीमियर या मासिकाच्याही त्या सब एडिटर होत्या. 'लोकसत्ता' ऑनलाईनमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून त्या दीड वर्ष कार्यरत होत्या. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Sayaji shinde talk about sindoor operation
Entertainment

“मतदान नीट केलं असतं तर हे झालंच नसतं”, पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरवर सयाजी शिंदेंचं मोठं वक्तव्य, नक्की काय म्हणाले?

मे 8, 2025 | 3:06 pm
Sambhavna Seth Says Miscarriage
Entertainment

डॉक्टरांच्या चुकीमुळे पोटातच बाळ गेलं, १५ दिवस कळलंच नाही अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर धक्कादायक प्रकार, जीवाशी खेळ

मे 8, 2025 | 1:30 pm
Next Post
Scientists Searching On God

खरंच देव आहे का?, वैज्ञानिकांनीच सांगितलं खरं सत्य, ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.