Beed Female Sugarcane Workers Women : महाराष्ट्रात असे अनेक दुष्काळी भाग आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बीड. बीड-दुष्काळी जिल्हा अशी ओळख असलेल्या दुष्काळी जिल्ह्यातून अनेक कामगार पोटापाण्यासाठी मात्र त्यांच्या राहत्या जिल्ह्यातून बाहेर येत कामधंदा शोधतात. विशेषतः हे बीडवासी पश्चिम महाराष्ट्राकडे ऊस तोडणीला येतात. उसाच्या शेतात भर उन-पावसात ऊस तोडण्याचं जिकरीचं आणि धोकादायक काम त्यांना करावं लागतं. मात्र पोटापाण्यासाठी त्यांना ही लढाई करावीच लागते. यावेळी अनेक महिला कामगारही काही महिन्यांसाठी त्यांच्या घरापासून दूर येत कामधंदा करतात. कधीकधी त्यांना त्यांच्या लेकरांना सोडूनही हे सगळं जगण्यासाठी करण्याची वेळ त्यांच्यावर येते. यादरम्यान, या महिलावर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या गोड ऊसाच्या आणि त्यापासून तयार झालेल्या गोडव्यामागचं कडू वास्तव म्हणजे ऊसतोडणी करणाऱ्या या महिला. राहायला धड छत नाही, प्यायला चांगले पाणी नाही, पोट भरेल इतके अन्नही त्यांच्या वाटेला नाही, अशा परिस्थितीत ती महिला अहोरात्र मेहनत करते. मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास, गरोदरपणात पोटुशी बाळ असताना पोटासाठीची धडपड, बाळंतीण झाल्यावर डोक्यावरून वाहायचे ओझे या सगळ्याकडे ती महिला केवळ जबाबदारी आणि जगण्याची आशा म्हणून पाहते. अशातच या महिला वर्गाच्या जगण्यामागचं भयानक सत्य समोर आलं आहे.
आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेत्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, याच वर्षी केलं होतं लग्न, हत्येमागचं धक्कादायक सत्य समोर
हो बीड जिल्ह्यातील हजारो महिलांनी ऊसतोडणीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढली. बीड जिल्ह्यात ७८ हजार ऊसतोड महिला कामगार आहेत. ऊसतोडीला जाण्यापूर्वी ८४३ महिला मजुरांची गर्भपिशवी काढली गेली. गर्भपिशवी काढलेल्या महिलांमध्ये ३०-३५ वयोगटातल्या ४७७ महिला आहेत. यातील १ हजार ५२३ म्हणजेच सुमारे दीड हजार महिला आजही गरोदरपणातही ऊसाच्या फडात काम करत आहेत. ऊसतोड महिला कामगारांचं ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढण्याचं वाढलेलं प्रमाण चिंताजनक आहे. आता जेव्हा हे आकडे समोर आलेत, तेव्हा गांभीर्याने चर्चा सुरु झाली आहे.
आणखी वाचा – आयपीएलमधून मुंबई इंडियन्सची एक्झिट नीता अंबानीला पडली महागात, मोठं नुकसान, इतके कोटी…
बीडसारख्या जिल्ह्यांमध्ये गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांचं प्रमाण धक्कादायकपणे वाढलं आहे. मासिक पाळीच्या सामान्य प्रक्रियेला अडचण मानून, तिला मुळापासून उपटून काढलं जातं आहे. आणि याचा परिणाम म्हणजे या महिला मातृत्वाला मुकतायत, स्त्री म्हणून त्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेतला जात आहे असं वाटत आहे.





