IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये विराट कोहलीच्या टीम आरसीबीने आश्चर्यकारक विजय मिळवला. १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विराट कोहलीच्या संघाने आयपीएलचा ‘किताब जिंकला आहे. सामना जिंकल्यानंतर विराट कोहली खूप भावनिक झाला. त्याच वेळी, अनुष्का शर्मा देखील आनंदाने भावुक झालेली पाहायला मिळाली. मॅच जिंकल्यानंतर अनुष्का व विराटने प्रेमाची मिठी मारत हा आनंद, या भावना एकमेकांसह शेअर केल्या. विराटचे चाहते सर्वत्र हा आनंद साजरा करत आहेत. बॉलिवूडपासून टेलिव्हिजनपर्यंत प्रत्येकजण खूप आनंदी आहे आणि आरसीबीचे अभिनंदन करत आहे.
अभिनेता रणवीर सिंग यांनी दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. त्याने विराटचा फोटो शेअर केला आणि लिहिले आहे की, “हेच सर्वकाही आहे”. तर आरसीबीच्या विजयाने रश्मिका मंदानाने लिहिले की, “विजयाचा हा एक सुगंध आहे”. तर अल्लू अर्जुनने लिहिले आहे की, “प्रतीक्षा संपली. Ee Sala Cup Namde. आम्ही १८ वर्षांपासून याची वाट पाहत होतो. प्रचंड अभिनंदन आरसीबी”. अनन्या पांडे, ईशान खट्टर आणि भूमी पेडनेकर यांनीही आरसीबीला विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.
आणखी वाचा – वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

अभिनेता सोनू सूद यांनी आरसीबीचा विजय साजरा करणारे अनेक फोटो शेअर केले आहेत. आणि कॅप्शनमध्ये असं लिहिले आहे की, “आरसीबी. मेहनतीचे फळ नेहमीच गोड असतं. अभिनंदन. पंजाबचे कठोर नशीब. पंजाब टीमही कठोर परिश्रमांसह खेळली. दोन्ही बाजूंनी आदर”. स्मृति इराणी यांनी आरसीबीसाठी पोस्ट शेअर करत अभिनंदन केले. त्याने लिहिले, “ई साला कप नामडे हे आता एक स्वप्न नाही. बंगलोर ही तुमची रात्र आहे. मिम्स, हार्टब्रेक आणि इतक्या वर्षांच्या अपेक्षेने बदला घेतला. हे अशा चाहत्यांसाठी आहे ज्यांनी कधीही अपेक्षा सोडल्या नाहीत. आरसीबी आणि विराट कोहली यांचे अभिनंदन”.
आणखी वाचा – अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…
एल्विश यादव याने देखील पोस्ट शेअर करत, “आरसीबी अभिनंदन. फायनली पहिली आयपीएल ट्रॉफी. विराटसाठी खूप आनंद झाला”. अभिनेता नकुल मेहता याने लिहिले, “बेंगलुरू उद्या बंद होणार आहे. चक दे फट्टे”.