लग्नानंतर 'या' अभिनेत्रीला सासरी सहन करावा लागला त्रास
टेलिव्हीजनवरील रश्मी देसाई ही नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे
२०१२ साली ती अभिनेता नंदिश संधुबरोबर लग्नबंधनात अडकली
मात्र चार वर्षानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला
घटस्फोटाबद्दल ती म्हणाली की, “आम्ही विचार केल्याप्रमाणे काहीही योग्य सुरु नव्हतं”.
“आमचे विचार, आमचा स्वभाव अजिबात एकसारखा नव्हता. आम्ही निर्णय घेण्यामध्ये खूप घाई केली”.
“आम्ही वेगळे झाल्यानंतर अनेकांनी मला दोष दिला”.
पुढे रश्मी म्हणाली की, “मला नेहमी घरातून बाहेर काढायचे. त्याने या नात्यामध्ये १००% दिले असते तर हे नातं टिकलं असतं”.