मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृताने छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाला सुरुवात केली असून आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर तिला चित्रपटांमध्ये संधी मिळाली. या संधीचं सोनं करत तिने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारली आहेत. चित्रपटातील अभिनयामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केला आहे. अभिनयाबरोबरच ती उत्तम नर्तिका असून ‘गणराज गजानन’ या गाण्यामुळे ती सध्या चर्चेत आली आहे. तिचं हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून हे गाणं रसिकांच्या पसंतीस उतरत आहे. (Amruta Khanvilkar talks about Shree Swami Samarth experience)
दरम्यान, या गाण्याच्या प्रमोशनच्या निमित्त अमृता अनेक कार्यक्रमांना हजेरी लावते. शिवाय, ती प्रसारमाध्यमांना मुलाखत देताना पाहायला मिळत आहे. नुकताच अमृताने एका माध्यमाशी संवाद साधला असून तिने आपल्याला आलेल्या स्वामी समर्थांच्या प्रचितीविषयी बोलली आहे. एका रेडिओ चॅनेलच्या दिलेल्या मुलाखतीत अमृताला ‘तुझ्या आयुष्यात स्वामींचे किती महत्व आहे?’ असा प्रश्न विचारला असता त्यावर ती म्हणाली, “मला असा वाटतं की, ज्यांना आयुष्यात खूप चमत्कार बघायचे असतात ते स्वामींच्या चरणी जातात आणि स्वामी त्यांना बोलावून घेतात. तुम्ही फक्त त्यांचा जप करा. त्यांचं असं काहीच सोपस्कार नाही, की खूप मोठी पूजा घाला. जितकं मनाने तुम्ही स्वामींचा जप करता, तितकं पुरेसं आहे. माझ्या पडत्या व अवघड काळात स्वामींनी मला बोलावून घेतलं, असं म्हणायला काही हरकत नाही.”
हे देखील वाचा – Video : बाप्पाचं विसर्जन करताना स्वप्निल जोशीच्या लेकाला कोसळलं रडू, अभिनेत्याने मुलाला समजावलं पण…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
“मी ज्याठिकाणी राहत होती, त्या ठिकाणी अगदीच हाकेच्या अंतरावर स्वामींचा मठ होतं. मी अनेक वर्ष दररोज त्या मठात गेली आहे. आणि त्यांची जी शक्ती आहे, ती फारच विलक्षण असून ती तुम्ही अनुभवू शकता. मी तुम्हाला सांगू नाही शकत की, माझ्याबरोबर त्या काळात काय काय घडलं ? किंवा कुठल्या गोष्टीतून त्यांनी मला बाहेर काढलं आहे. त्यामुळे स्वामींची शक्ती आहे, ती फक्त तुम्ही अनुभवू शकता.”, असं अमृता म्हणाली.